शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश
2
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
3
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
5
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
6
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

जालन्यात डाळींच्या भावात अचानक तेजी; शेतकऱ्यांना मिळाले चांगले दर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 12:01 PM

बाजार गप्पा : जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळींच्या भावात अचानक तेजी आल्याने शेतकऱ्यांना चांगले दर मिळत आहेत.

- संजय देशमुख (जालना)

जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळींच्या भावात अचानक तेजी आल्याने शेतकऱ्यांना चांगले दर मिळत आहेत. असे असले तरी ही तेजी फार दिवस टिकणार नसल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. साखरेचा कोटा केंद्र सरकारने जाहीर केला असून, तो २२ लाख मेट्रिक टन आहे. दिवाळी संपताच साखरेच्या दरात ५० रुपयांची घसरण झाली.

पावसाने हुलकावणी दिल्याने यंदा जालना बाजारपेठेत मूग, तूर तसेच उडदीची पाहिजे तशी आवक आलेली नाही. याचा परिणाम डाळींच्या भाववाढीवर झाल्याचे सांगण्यात आले. तूर, हरभरा डाळीत प्रतिक्विंटल ४०० ते ५०० रुपयांची तेजी आली आहे. मागणीच्या तुलनेत डाळींची आवक कमी झाल्याने हे भाव वाढले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये प्रथमच तेजी आल्याचे दिसून आले. दिवाळी संपल्यावर बाजारातील ग्राहकीही कमी झाली आहे.

शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळख असलेल्या कापूस खरेदीला खासगी बाजारात प्रारंभ झाला आहे. मात्र, पाहिजे तेवढा दर मिळत नसल्याने आजही जालन्यातील कापूस गुजरातकडे जात आहे. तेथील व्यापारी थेट गावात गाडी आणून कापूस जागेवर खरेदी करीत असल्याने शेतकरी थोडा कमी भाव मिळत असला, तरी तो रोखीने मिळत असल्याने व्यापाऱ्यांना कापूस विक्री करीत असल्याचे चित्र आहे. जालना बाजारपेठेत सध्या सोयाबीनची आवक ही ५०० हजार क्विंटलपेक्षा जास्त असून, यातही क्विंटलमागे चांगल्या सोयाबीनला ३३०० रुपयांचा भाव मिळत आहे.

ज्वारीदेखील बऱ्यापैकी येत असली तरी त्याचे भाव गेल्या आठवड्यातीलच कायम आहेत. नवीन गुळाची आवक आता सुरू झाली असून, कोल्हापूर, लातूर तसेच शेजारील विदर्भातून गुळाची आवक येत आहे. शासनाने सुरू केलेल्या हमीभाव केंद्रावर मात्र शेतकरी फिरकत नसल्याचे चित्र आहे. दिवाळी संपल्यानंतर आता व्यापाऱ्यांना ग्राहकांची चिंता सतावत असल्याचे बोलले जात आहे. मोसंबीची आवक बऱ्यापैकी असली तरी शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नाही.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी