शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
4
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
5
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
6
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
7
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
8
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
9
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
10
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
11
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
12
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
13
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
14
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
15
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
16
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
17
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
18
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
19
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
20
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल

शेतीचे उत्पादन वाढीसाठी सुपर-२० कार्यक्रम; पेरणीपासून ते काढणीपर्यंत कृषी विभागाचे मार्गदर्शन

By महेश गायकवाड  | Published: May 20, 2023 7:44 PM

शेती मशागत कामाला हात भार लावण्याकरिता कृषी विभागाने मागील दोन वर्षांत यांत्रिकीकरणावर भर दिला आहे.

जालना: यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी कृषी विभागाने २० कलमी कार्यक्रम आखला आहे. त्याची अंमलबजावणी यशस्वीरित्या करण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी कामाला लागले आहे. शेतकऱ्यांची खते, बि-बियाणे व किटकनाशके खरेदी करताना फसवणूक होऊ नये यासाठी कृषी सेवा केंद्रावर कडक नजर राहण्याबरोबरच शेतकऱ्यांना खरीप हंगामात पेरणी पासून ते काढणीपर्यंत पीकनिहाय उत्पादनवाढीच्या सूत्राचे मार्गदर्शन कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी करणार आहेत.

खरीप हंगाम हा शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर परिणाम करणारा घटक आहे. त्यामुळे त्याचे योग्य नियोजन झाले तरच उत्पादनात वाढ होणार आहे. तालुक्यात सोयाबीनसह कपाशीच्या क्षेत्रात वाढ होत आहे. खरीप हंगामातील सोयाबीन आणि इतर पिकांच्या पेऱ्यात उशीर झाला तरी त्याचा उत्पादनावर परिणाम होणार नाही. यावर्षी कापसाला अपेक्षित भाव मिळाला नाही. तरीसुद्धा कापसाच्या क्षेत्रात वाढ होणार आहे. त्याचबरोबर कमी कालावधीत अधिकच्या उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या सोयाबिनचा पेराही वाढणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.

काय आहे सुपर-२० कार्यक्रमजालना जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांनी सर्व तालुक्यास खरीप हंगामाच्या नियोजनासाठी २० कलमी आराखडा आखून दिला आहे. यात प्रामुख्याने बीज उगवण क्षमता तपासणी, बीज प्रक्रिया, कृषी सेवा केंद्रनिहाय कृषी कर्मचारी, अधिकारी यांची नियुक्ती करणे, जमिनीच्या सुपीकता निर्देशांकानुसार खत व्यवस्थापन, पीकनिहाय उत्पादनवाढीची सूत्रे या बाबींचा समावेश आहे. यांत्रिकीकरणावर भर देणारशेती मशागत कामाला हात भार लावण्याकरिता कृषी विभागाने मागील दोन वर्षांत यांत्रिकीकरणावर भर दिला आहे. एकट्या जाफराबाद तालुक्यात  ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलित औजारासाठी ३६४ लाभार्थींना २ कोटी ६४ लाख, सिंचनासाठी (ठिबक व तुषार संच वगळता) २११९ लाभार्थींना ४ कोटी ३६ लाख, फलोत्पादन घटकासाठी २३१ लाभार्थींना १ कोटी ९२ लाख असे एकूण ८ कोटी ९२ कोटींचा निधी वितरित केला आहे.- संतोष गायकवाड, तालुका कृषी अधिकारी.

टॅग्स :JalanaजालनाagricultureशेतीFarmerशेतकरी