शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

'तिखट मिरचीचा 'गोडवा', शेतकऱ्याचा नाद खुळा'; ११ एकर मिरचीतून घेतले ५५ लाखांचे उत्पन्न

By विजय मुंडे  | Published: July 19, 2023 4:00 PM

योग्य नियोजन करून शेती केली तर चांगले उत्पन्न; शेतकऱ्यांच्या मिरची शेतीतून ५० मजुरांच्या हातालाही मिळाले काम

- फकिरा देशमुखभोकरदन (जि.जालना) : ११ एकरात विविध प्रकारच्या मिरचीची लागवड करून एका शेतकरी कुटुंबाने तीन महिन्यांत तब्बल ५५ लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. आणखी दोन महिने ही मिरची विक्री होणार असून, मिरचीला असाच भाव राहिला तर उत्पन्न एक कोटीच्या घरात जाणार आहे. तिखट मिरचीचा 'गोडवा' चाखण्याची किमया धावडा (ता.भोकरदन) येथील शेतकरी कुटुंबाने साधली आहे.

भोकरदन तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात मिरची लागवड करतात. यावर्षी ५ हजार हेक्टरमध्ये मिरची लागवड झाली आहे. धावडा येथील शेतकरी एकबालखाँ अक्रमखाँ पठाण, खालेदखाँ पठाण या भावंडांनी ११ एकरमध्ये १३ ते ३० एप्रिल या कालावधीत गादीवाफे बेड तयार केले. त्यावर मल्चिंग पेपर टाकून ठिबकद्वारे पाणी देऊन सिमला, पिकाडोर, बलराम, ज्वलरी, तेजा अशा विविध प्रकारच्या मिरचीची चार बाय सव्वा अंतरावर ठिबक नळीच्या दोन्ही बाजूने लागवड केली. या लागवडीसाठी पठाण कुटुंबाला १० लाख ८० हजार रुपयांचा खर्च आला आहे. यावर्षी उन्हाची तीव्रता अधिक होती. त्यामुळे केलेला खर्च निघतो की नाही याची भीती या कुटुंबाला होती;

परंतु एकबालखाँ पठाण यांनी न डगमगता मिरची पिकावर औषधी, खते, फवारणी केली. शेवटी मिरचीसाठी पाणी कमी पडू लागले तेव्हा टँकरने पाणी विकत घेऊन मिरची जोपासली. जूनमध्ये प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात झाली. त्यांना ११ हजार, १० हजार, ९ हजार असा भाव मिळाला. तर सिमला मिरचीला ४ हजार ५०० व पिकडोरला सुद्धा ४ हजारांचा भाव मिळाला. त्यामुळे आजवर त्यांना ५५ लाख ३० हजार रुपयांचे उत्पादन मिळाले. यापुढील काळात असाच भाव राहिला तर त्यांचे उत्पन्न एक कोटीच्या घरात जाणार आहे. शिवाय दोन महिन्यांनंतर त्यांना लाल मिरचीचे उत्पन्न मिळणार आहे.

योग्य नियोजन करून शेती केली तर चांगले उत्पन्नआम्ही किराणा व्यावसायिक असलो तरी शेती कसण्याची आवड आम्ही जोपासली आहे. यातूनच यंदा ११ एकर शेतात विविध प्रकारच्या मिरचीची लागवड केली होती. योग्य व्यवस्थापन आणि कुटुंबातील सदस्यांनी केलेल्या कष्टामुळे सध्या चांगले उत्पन्न मिळत आहे. आजवर ८ तोडे झाले असून, त्यासाठी ४० महिला मजूर दररोज शेतात कामाला येतात. शिवाय १० सालदार आहेत. शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करून शेती केली तर त्यांना चांगले उत्पन्न मिळेल.- एकबालखाँ पठाण, शेतकरी धावडा

टॅग्स :FarmerशेतकरीCropपीकJalanaजालना