शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

महायुती घाबरली; निवडणूक कधीही घ्या, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच: जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 6:37 PM

पराभवाच्या भीतीनेच महायुती सरकारवरने विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला

भोकरदन: विधानसभा निवडणुका कधीही झाल्या तरी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होईल., असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. तसेच पराभवाच्या भीतीनेच महायुती सरकारवरने विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याचा आरोप पाटील यांनी यावेळी केला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आयोजित शिवस्वराज्य रथ यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, या यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप भोकरदन येथे करण्यात आला. यावेळी पाटील बोलत होते. 

भाजपाचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांचा गड असलेल्या भोकरदन येथे रविवारी रात्री शिवस्वराज्य यात्रेच्या समारोपा दरम्यान जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, महायुतीचे सरकार निवडणुकींना घाबरत असून त्यामुळेच निवडणुका पुढे लोटण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र निवडणुका कधीही घ्या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हा महाविकास आघाडीचाच असेल. कार्यकर्त्यांनी संयमाने निवडणुकीला सामोरे जावे व बेरजेचे राजकारण करून आपल्या उमेदवारास विजयी करावे, असे आवाहन देखील पाटील यांनी केले.

खासदार अमोल कोल्हे यांनी शिवस्वराज्य यात्रेच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करत भोकरदन विधानसभेचा आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला. तर माजी पालकमंत्री राजेश टोपे यांनी शरद पवारांच्या विचारांवर आधारित राजकारण समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देऊ शकते, असे सांगत विरोधकांच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन केले.

स्थानिक नेत्यांमधील वाद अन् जयंत पाटील संतापलेशिवस्वराज्य यात्रेच्या समरोपा दरम्यान, माजी आमदार चंद्रकांत दानवे आणि जाफराबाद नगराध्यक्षा सुरेखा लहाने यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या गोंधळामुळे सभेचे वातावरण तंग झाले होते. यावर जयंत पाटील यांनी कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली आणि पक्षाच्या शिस्तीचे पालन करण्याचे आवाहन केले, गोंधळ घालून विरोधकांना मदत होऊ नये, अशीही सूचना दिली.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसJalanaजालना