शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
2
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजुला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
3
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
4
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
5
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
6
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
7
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
8
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
9
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
10
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
11
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
12
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
13
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
14
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
15
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
16
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
17
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
18
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
19
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
20
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...

मराठवाडा मुक्तिसंग्रामातील शहिदांचे वरूड बुद्रुक येथील स्मारक मोजतेय शेवटची घटका

By शिवाजी कदम | Published: September 16, 2023 7:55 PM

तरुण पिढीला वारसा समजणार कसा, पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष

- नसीम शेखटेंभुर्णी :मराठवाडा मुक्तिसंग्रामात योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचा शासनाकडून गौरव करण्यात येत आहे; मात्र मुक्तिसंग्रामात शहीद झालेल्या क्रांतिकारकांच्या स्मारकाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. जाफराबाद तालुक्यातील वरूड बुद्रुक येथील हुतात्मा स्मारकाची मोठी दुरवस्था झाली आहे. या स्मारकाकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर ते इतिहासजमा होण्याची शक्यता आहे.

मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात जाफराबाद तालुक्यातील वरुड बुद्रुक परिसरातील भगवंतराव देशमुख, जयसिंग घायवट, तुकाराम सातव, सिताराम सातव, शामराव कुलकर्णी या शहिदांचा समावेश आहे त्यांच्या स्मरणार्थ हुतात्मा स्मारक उभारण्यात आले आहे. १९८०च्या दशकात राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री ए.आर.अंतुले यांच्या आदेशाने वरूड बुद्रुक येथे स्मारक आणि स्तंभ उभारण्यात आला आहे.

स्मारकाची पडझडसुमारे ४५ वर्षांपूर्वी येथे मराठवाडा मुक्तिसंग्रामातील शहिदांच्या आठवणींसाठी स्मारक उभारण्यात आले; परंतु सध्या या स्मारकाची दुरवस्था झालेली आहे. शहीद स्तंभाची पडझड झालेली असल्याने तो नष्ट होण्याच्या मार्गावर आला आहे. स्तंभासाठी स्वतंत्र संरक्षक भिंत नसल्याने कुत्री व इतर जनावरांचा या ठिकाणी मुक्त संचार असतो. या स्तंभाच्या देखरेख करण्याची यंत्रणा नसल्याने परिसरात मोठी घाण साचलेली असते. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन या स्मारकाचे संर्वधन करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

संवर्धन करण्याची गरजशहीद स्मारकाची देखरेख करण्याची जबाबादारी बांधकाम विभागाची असल्याचे सांगण्यात येत होते; परंतु स्मारकाचे संवर्धन करण्याचे काम राज्य पुरातत्त्व विभागाकडे देण्यात आले आहे; मात्र पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्मारकाकडे पाठ फरविल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :JalanaजालनाMarathwadaमराठवाडा