शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : अभिजीत पाटलांनी पुन्हा शरद पवारांची भेट घेतली; माढ्यात उमेदवारी मिळणार?
2
अजित पवार मोठी घोषणा करणार?;  पटेल, तटकरे, छगन भुजबळांसह घेणार पत्रकार परिषद
3
१४७ वर्षांनंतर पहिल्यांदाच झालं असं! पाकिस्तानचे लाजिरवाणे विक्रम; ३ वर्षांपासून विजयाचा दुष्काळ
4
PAK vs ENG : पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव; इंग्लंडने घरात घुसून कार्यक्रम केला, शेजाऱ्यांची पुन्हा फजिती
5
Who is Shantanu Naidu: "गुडबाय माय डियर लाईट हाऊस"; टाटांसह सावली सारखा असणारा शंतनू नायडू कोण?
6
अखेर नवी मुंबई विमातनळावर उतरलं पहिलं विमान; धावपट्टीची चाचणी यशस्वी
7
इस्रायलचा लेबनानमध्ये भारतीय सैन्य असलेल्या ठिकाणी हल्ला; इंडोनेशियाचे तीन जवान जखमी, संयुक्त राष्ट्रे संतापली
8
AUS vs IND : पुणेकर पडलाय मागे; त्या शर्यतीत माजी निवडकर्त्यानं दिली मुंबईकराला पसंती
9
करिअर की लग्न यात गोंधळलात? ऐश्वर्या नारकर यांनी तरुणाईला दिला मोलाचा सल्ला, उलगडला त्यांचा प्रवास
10
Airtel, Jio की Vi, कोणत्या कंपनीकडे आहे सर्वात स्वस्त Netflix प्लॅन?
11
Ajit Pawar : 'महायुतीत अजित पवारांना बाजूला करण्याचे प्रयत्न'; काँग्रेस नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
12
Jio Financial Services नं लाँच केलं जिओ फायनान्स अ‍ॅप; युझर्सना मिळणार अनेक ऑफर्स, जाणून घ्या
13
देवेंद्र फडणवीसांपेक्षा शाह-शिंदेंची जवळीक का वाढली?; संजय राऊतांचा मोठा दावा
14
कॉलेजमध्ये शिक्षणासोबत मिळणार नोकरी आणि पैसे; UGC नं तयार केला जबरदस्त प्लॅन
15
"माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो..."; शिवसेना दसरा मेळाव्याआधीच राज ठाकरे चर्चेत
16
'गूडन्यूज' चा योग! पुन्हा Ajinkya Rahane साठी फायद्याचा ठरणार? Rohit Sharma आउट झाला तर...
17
पुण्यात पुन्हा हिट-अँड-रन; ऑडीच्या धडकेत डिलिव्हरी बॉयचा मृत्यू,घरातून केली अटक
18
देवळाली कॅम्पमध्ये प्रशिक्षण सुरु असताना २ अग्निवीरांचा मृत्यू; तोफेचा बॉम्बगोळा फुटल्यानंतर अपघात
19
Rafael Nadal च्या या खास अंदाजामुळे MS धोनीही झाला त्याचा 'जबरा फॅन' (VIDEO)
20
५ हजार कोटींच्या घोटाळ्याचा सुत्रधार दुबईतून ताब्यात; सौरभ चंद्राकरला आणणार भारतात

जालन्यातील समृद्धीचे काम संपले; कंत्राटदारावरच्या २४२ कोटींच्या दंड वसुलीचे त्रांगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2022 12:32 PM

मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गाचे काम आता जवळपास ९० टक्के पूर्ण झाले आहे.

जालना : जालना जिल्ह्यातील २५ गावांमधून समृद्धी महामार्ग जात आहे. या रस्त्याचे तेराशे कोटी रुपयांचे कंत्राट हे गुजरातमधील माँटेकार्लो कंपनीला मिळाले होते. या कंपनीने हे काम करताना अवैध मार्गाने माती, मुरूम आणि दगडाचे उत्खनन केल्याचा आरोप जालना आणि बदनापूर तहसीलदारांनी तपासणीअंती केला होता. त्यामुळे त्यांना २४२ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. जालन्यातील हे काम संपल्याने दंड वसुलीचे त्रांगडे निर्माण झाले आहे.

मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गाचे काम आता जवळपास ९० टक्के पूर्ण झाले आहे. न्हावा ते गेवराई अशा जवळपास ४२ किलोमीटरचे काम माँटेकार्लो कंपनीस भेटले होते. चार वर्षांत या कंपनीने हे काम करत असताना आजूबाजूच्या डोंगरातून मोठ्या प्रमाणावर मुरूम, माती तसेच दगडांचे उत्खनन केले होते. याबाबत जालना आणि बदनापूर येथील तहसीलदारांनी ईटीस प्रणालीद्वारे तपासणी करून हा दंड कंपनीस आकारला होता.परंतु कंपनीने हा दंड मान्य नसल्याने त्यांनी थेट उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टात याविरुद्ध अपिल केले होते. ते त्यांचे अपील या दोन्ही कोर्टाने फेटाळून संबंधित कंपनीने प्रथम ज्यांनी दंड आकारला त्यांच्याकडे तो कमी करून मिळावा म्हणून अर्ज करणे अपेक्षित होते; परंतु तसे कंपनीने न करता त्यांनी थेट वरिष्ठ न्यायालयात या दंड आकारणीस आव्हान दिले होते. याच प्रकरणात बदनापूरचे माजी आ. संतोष सांबरे यांनीही हस्तक्षेप याचिका दाखल केली होती.

आता सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण निकाली काढूनही तीन महिने झाले आहेत. असे असताना कंपनीकडूनही दंड आकारणी चुकीची असल्याचा दावा कंपनीचे येथील वरिष्ठ अधिकारी अनिलकुमार यांनी सांगितले. ते म्हणाले की, आम्ही उत्खनन करण्यापूर्वी संबंधित विभागाला परवानगी मागितली होती; परंतु ती त्यांनी दिली नाही. विशेष म्हणजे आम्हाला काम करतानाच रॉयल्टी माफ असल्याचे अधिकार दिले होते. त्यानुसार आम्ही हे उत्खनन केल्याचे अनिलकुमार यांनी सांगितले. तसेच आम्ही आता महसूलमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे रीतसर अर्ज करणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गJalanaजालना