शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

'आता बॉम्ब टाकले तरी मागे हटणार नाही...'; मनोज जरांगे यांच्याशी थेट संवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2023 7:59 AM

मनोज जरांगे पाटील यांची ‘लोकमत’ने घेतलेली एक्स्क्ल्युझिव मुलाखत.. 

- राम शिनगारे

अंतरवली सराटी (ता. अंबड, जि. जालना) : मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवली सराटी गावात २८ ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील हे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. शुक्रवारी पोलिसांनी उपोषणस्थळी केलेला गोळीबार व लाठीहल्ल्यामुळे आंदोलन चर्चेत आले आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची ‘लोकमत’ने घेतलेली एक्स्क्ल्युझिव मुलाखत.. 

प्रश्न :  पोलिसांनी गोळीबार केलाय का? उत्तर : ही बघा गोळी. (जवळील रिकामी बुलेट दाखवतात). आमच्याकडे काही बुलेटचा कारखाना नाही ?

प्रश्न :  आंदोलन किती दिवस चालणार? उत्तर : आरक्षण मिळाल्याशिवाय आता माघार नाही. काल त्यांनी गोळीबार केला. आता बॉम्ब टाकले तरी मागे हटणार नाही. 

प्रश्न    प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आंदोलन कशासाठी? उत्तर : आम्ही न्यायप्रविष्ट आरक्षणाचा विषय घेतलेलाच नाही. मराठवाड्यातल्या मराठ्यांना पूर्वी आरक्षण होतं, ते आरक्षण द्या, असं आम्ही म्हणतोय. जर हे न्यायप्रविष्ट असतं तर मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी समिती कशाला गठित केली? विदर्भाच्या अगोदर हैदराबाद संस्थानात होतं ते आरक्षण द्या, असं आमचं म्हणणं आहे.

प्रश्न   मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतरही आंदोलन सुरू का ठेवलं? उत्तर : त्यांनी फोन केला, की आता आंदोलन करण्याची आवश्यकता नाही. मी आरक्षण देतो. त्यावर मी म्हणालो, साहेब तुमच्या समितीनं अहवालच दिलेला नाही. त्यावर असं असेल तर मी आत्ताच्या आत्ता समितीला बोलावतो आणि तुम्ही अहवाल केलाय का ते विचारतो, असं मुख्यमंत्री म्हणाले. ते पुन्हा फोन करतो म्हणाले, एका तासात केला नाही आणि आता आमच्यावर थेट हल्लाच झाला.

प्रश्न  पोलिस म्हणतात, तुमची प्रकृती खालावल्यामुळे रुग्णालयात नेणं गरजेचं होतं? उत्तर : आता काल तब्येत खालावली म्हटल्यावर मी आज तर बोलतोय. मी जर बोलू शकतो, तर तब्येत खालावली कोणाची? तरी मी एसपींना सांगितलं, की तुम्हाला काय ट्रीटमेंट करायची ती करा. तयार झाले, त्यांनी डॉक्टर आणले, माझ्या सगळ्या तपासण्याही केल्या. तब्येत चांगली राहण्यासाठी मला पाणीही प्यायला लावलं. तुम्ही उपचार घेतले, आम्ही खूश झालो आणि चाललो, असं म्हणाले. दोनशे मीटरवर गेले आणि एकाएकी ५०० पोलिसांचा ताफा आला आणि लोकांना मारायला लागला, याचं काय कारण?

प्रश्न   आंदोलन चिघळलं कसं?उत्तर : हे आंदोलन लाठीचार्जमुळे राज्य सरकारनं चिघळवलं. सरकारला मराठ्यांना काहीच द्यायचं नाही. म्हणून यांनी जाणूनबुजून हे आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला.  

टॅग्स :JalanaजालनाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार