शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
3
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
4
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
5
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
6
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
7
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
8
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
9
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
10
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
11
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
12
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
13
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
14
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
15
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
16
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
17
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
18
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
19
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
20
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर

मस्ती आहे का...?; ज्या जातीचे लोक मराठ्यांना त्रास देतील...! मनोज जरांगेंचा नाव न घेता धनंजय मुंडेंना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2024 2:36 PM

जरांगे म्हणाले, "खरे तर जय-पराजय कुणाचा तरी असतोच. मराठ्यांनीच पाडलंय की काय? असा संशय घ्यायचा आणि त्यांचे लोकं मराठ्यांच्या मागे लावायचे. त्याने काही होत नसते. मान्य करायचा जय-पराजय."

राज्यात पुन्ह एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटण्याची चिन्ह आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मनोज जरांगे (Manoj Jarange) पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. यावेळी, "ज्या जातीचे लोक आमच्या मराठ्यांना त्रास देतील, त्या जातीचा नेता आम्ही पाडणार. आल्याच विधानसभा निवडणुका जवळ." असे म्हणत, जरांगे यांनी नाव न घेता पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना इशारा दिला आहे. ते जालन्यातील अंतरवाली सराटी येथे पत्रकारांसोबत बोलत होते.

जरांगे म्हणाले, "आमच्या लोकांना बीड, माजलगाव, केज, गेवराई येथे मारहाण झाली. महाजनवाडी बीड तालुक्यातील लोकांना तलवारीने मारलंय. त्यांच्या नेत्याचे काम आहे, त्यांच्या जातीला शांततेचे आवाहन करण्याचे. तुम्ही म्हणताय ते कोण विरोधक आहेत ना, त्यांनीही या नेत्यांना आरोप करायला हवेत की, तुम्ही का आवाहन करत नाही? जरांगे पाटील शांततेचे आवाहन करत आहेत, तुम्ही का करत नाही? ते मजा बघतात, परदेशात जाऊन झोपतात आणि इकडे धिंगाणा लावून दिलाय." 

"...आपण काही अन्याय सहन करायला जन्म घेतलेला नाही" -"मी कुणाला पाडा म्हणालो का? कुणाला निवडून आणा म्हणालो का? काय घोषणा होत्या त्या दिवशी कलेक्टर ऑफिससमोर? मस्ती आहे का...? मी काय केलं होतं? पाडा म्हणालो का तिला (पंकजा मुंडे)? तरीही मी माझ्या समाजाला आवाहन केले आहे, मराठ्यांनो शांत रहा एक दोन महिने. यांना चुका करू द्या. ज्या दिवशी नरड्याला लागेल त्या दिवशी बघू. आपण काही अन्याय सहन करायला जन्म घेतलेला नाही. पण सध्या शांत राहा. गृहमंत्र्यांनी आणि बीडच्या एसपी साहेबांनी तातडीने लक्ष घालावे. यांचा जाणून बुजून उद्रेक करण्याचा अंदाज आहे. यांना आवर घाला. शहाने असाल तर यांना आवर घाला आम्ही अजूनही शांत आहोत आणि महिना दोन महिने शांत राहाणार आहोत. हा शब्द आहे माझा. पण फारच अन्याय होत असेल, तर आम्ही शांत तरी कसे राहायचे, याचे उत्तर प्रशासनानेच द्यावे," असेही जरांगे म्हणाले. 

"मराठा समाजाला माझे आवाहन आहे, शांत राहा" -जरांगे म्हणाले, "महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठा समाजाला माझे आवाहन आहे की, शांत राहा. बघूया हे किती दिवस अन्या करताता. काय अन्याय करायचा ते करू द्या यांना. बीड तालुक्यातील महाजनवाडी येथील लोकांनाही यांनी बराच त्रास दिला.  तरी बीड जिल्ह्यातील मराठा समाजाला माझे आवाहन आहे की तरी शांत राहा. नरड्याला लागल्यावर बघूया."

याला खत-पाणी घालण्याचं काम सरकार करतंय का? असा प्रश्न केला असता, जरांगे म्हणाले, "नाही सरकार नाही करत, त्यांचे नेते करतायत. आम्ही  गेल्या एक दीड महिन्यापासून शांततेचे आवाहन करत आहोत. ते करत नाहीत. याचा अर्थ त्यांना जातीय तेढ निर्माण करायची आहे आणि सुव्यवस्था बिघडवायची आहे."

...त्या जातीचा नेता पाडणार -यावेळी, धनंजय मुंडे यांचे नाव न घेता इशारा देताना जरांगे म्हणाले, "खरे तर जय-पराजय कुणाचा तरी असतोच. मराठ्यांनीच पाडलंय की काय? असा संशय घ्यायचा आणि त्यांचे लोकं मराठ्यांच्या मागे लावायचे. त्याने काही होत नसते. मान्य करायचा जय-पराजय. मी जाहीर पणे सांगितले आहे, ज्या जातीचे लोक आमच्या मराठ्यांना त्रास देतील, त्या जातीचा नेता पाडणार आम्ही. वेळ प्रसंगी तेथे उमेदवार देणार नाही, पण त्याला पाडणार. आल्याच विधानसभा निवडणुका जवळ." 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDhananjay Mundeधनंजय मुंडेMaratha Reservationमराठा आरक्षणBeedबीडlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४