शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : 'अमित शहांना पवार, ठाकरेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे डोहाळे लागलेत'; ठाकरे गटाचा सामनातून हल्लाबोल
2
सदोष वेल्डिंग, कमकुवत ढाचामुळे कोसळला पुतळा; चौकशी समितीच्या अहवालात निष्कर्ष
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी करणार्‍यांना लाभाच्या संधी मिळतील; नशिबाची साथ लाभेल
4
पोर्न स्टार रिया बर्डे निघाली बांगलादेशी, बनावट कागदपत्रांसह भारतात राहिल्या प्रकरणी केली अटक
5
विधानसभा निवडणुकीचे वेध; आयोगाची आज पक्षांशी चर्चा, मुख्य सचिव, वरिष्ठ अधिकारी यांची बैठकही घेणार
6
शेतमजूर, कामगारांच्या किमान वेतनात वाढ; केंद्र सरकारचा निर्णय
7
अग्रलेख : विकास किती पाण्यात?; ‘स्मार्ट सिटी’ बनणाऱ्या शहरांना किंचितही अधिकसा पाऊस सोसवेनासा
8
बिल्किस बानो प्रकरणी फेरआढाव्याची गरज नाही; सुप्रीम काेर्टाने फेटाळली गुजरात सरकारची याचिका
9
मेडिकलच्या तीन मुलींनी घेतली सहा जणांची रॅगिंग; मुली एमडी अभ्यासक्रमाच्या
10
लोकमतच्या व्यासपीठावर सर्वपक्षीय नेत्यांची जुगलबंदी; विधानसभेनंतर आणखी पक्ष आमच्याकडे येतील : मुनगंटीवार
11
ड्युटीवरून गायब झालेले १२ पोलिस निलंबित; आरबीआयच्या संरक्षणाची होती जबाबदारी
12
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
13
कॅन्सरवरील उपचार सुसह्य होण्यासाठी आता ‘डॉग थेरपी’; टाटा रुग्णालयात मुलांसाठी अनोखा उपक्रम
14
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
15
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
16
शासकीय रुग्णालयांत हृदयविकारांवर अत्याधुनिक उपचार; जे.जे. मध्येही आता ईपी लॅब, ३९ कोटी मंजूर
17
नऊ प्रकल्पांच्या निधीची चिंता मिटली; एमएमआरडीएला ‘पीएफसी’कडून ३१,६७३ कोटींचे कर्ज मंजूर
18
नवी मुंबई विमानतळ सुखोईच्या लँडिंगसाठी सज्ज; सिडकोचे विजय सिंघल यांची माहिती
19
‘काैटुंबिक हिंसाचार कायदा सर्व धर्मांतील महिलांना लागू’
20
मधुमेह, जीवनसत्त्वे, रक्तदाबावरील गोळ्यांसह ५३ औषधे ठरली निकृष्ट दर्जाची

ट्युशनला जातो सांगून घराबाहेर पडलेली तीन शाळकरी मुलं बेपत्ता

By विजय मुंडे  | Published: August 16, 2023 7:29 PM

पोलिस पथकासह पालक, नातेवाईक शोध कार्यासाठी विविध मार्गावर

जालना : ट्युशनला जाण्याच्या बहान्याने मंगळवारी सकाळी घराबाहेर पडलेली जालना शहरातील तीन शाळकरी मुलं बेपत्ता झाली आहेत. या प्रकरणात कदीम पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, पोलिस यंत्रणा तपास करीत आहे. शिवाय त्या शाळकरी मुलांच्या शोधासाठी पालकांसह नातेवाईकही विविध मार्गावर फिरत आहेत.

अंकित प्रकाश जाधव (वय-१५ रा. सिचंन वसाहत, ईदगा मैदानाच्या मागे जुना जालना), स्वराज संतोष मापारी (वय-१४ रा. घायाळ नगर, जुना जालना) व हर्षद अशोक देवकर (वय-१४ रा. कसबा, गांधीचमन, जुना जालना) अशी बेपत्ता झालेल्या मुलांची नावे आहेत. पाटबंधारे विभागात कामाला असलेले प्रकाश जाधव हे मंगळवारी स्वातंत्र्यदिनानिमित्त झेंडावंदनासाठी निघाले होते. त्यावेळी स्वराज मापारी व हर्षद देवकर हे दोघे त्यांच्या घरी आले. त्यांनी त्यांचा मुलगा अंकित याला हाक दिली. झोपेत असलेल्या अंकितला त्याच्या वडिलांनी उठविले आणि ते झेंडावंदनासाठी गेले. कार्यक्रमानंतर दुचाकीच्या डिक्कीतील हेडफोन मित्राला देण्यासाठी त्यांनी कुटुंबियांशी संपर्क साधला. त्यावेळी दुचाकी व अंकित घरी नसल्याचे समजले. घरातील दरवाजाच्या हॅण्डलला एक चिठ्ठी आढळली. त्यानंतर जाधव यांनी मापारी, देवकर कुटुंबाशी संपर्क साधला असता ते दोघे ट्युशनसाठी जात असल्याचे सांगून घरातून निघाल्याचे समजते. ते तिघे बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच नातेवाईकांनी सर्वत्र शोध सुरू केला. सायंकाळपर्यंत त्या तिघांचा शोध न लागल्याने या प्रकरणात प्रकाश जाधव यांनी कदीम ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून, त्या तिघांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पत्ता शोधण्याचा प्रयत्न करू नकाअंकित जाधव याने घर सोडण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली आहे. मम्मी, पप्पा आणि मयूर तुम्ही हे लेटर वाचेपर्यंत वेळ निघून गेलेली असेल. मी एवढा माेठा झालो नाही की मी असे डिसिजन घ्यावे. मी घर सोडून जात आहे. पत्ता शोधण्याचा प्रयत्न करू नका वगैरे मजकूर चिठ्ठीत आहे. ही चिठ्ठी हाती लागल्यानेच ते तिघे मित्र घरातून निघून गेल्याचे समोर आले.

सोशल मीडियातून आवाहनत्या तिन्ही शाळकरी मुलांचा पोलिस दलाच्या वतीने विविध माध्यमातून शोध घेतला जात आहे. त्याशिवाय फेसबूक, व्हाटस्ॲप आदी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्या तिन्ही मुलांच्या शोधासाठी प्रयत्न केले जात आहेत.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभावउद्योगनगरी, बियाणांची राजधानी म्हणून जालना शहराची ओळख. परंतु, जालना शहरातील प्रमुख मार्गावर, चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव आहे. दुचाकी चोरी, वाहन चोरीसह घरफोड्यांच्या घटना सतत होतात. परंतु, सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने चोरटेही सापडत नाहीत. शहरातील प्रमुख मार्गावर, चौकात सीसीटीव्ही कॅमेरे असते तर ते शाळकरी मुलं कोणत्या मार्गावरून गेले याचा शोध घेण्यास पोलिसांनाच मदत झाली असती. परंतु, प्रमुख मार्गावरच सीसीटीव्ही नसल्याने शोध कार्यात अडथळा निर्माण होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालनाKidnappingअपहरण