शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 4:55 AM

गेवराईहून जालन्याकडे बस निघाली होती. बस शहापूरजवळ आली असता अंबडहून मोसंबी घेऊन येणाऱ्या ट्रकबरोबर समोरासमोर धडक झाली. 

अंबड/वडीगोद्री (जि. जालना) :  जालना-वडीगोद्री मार्गावर शहापूरजवळील वळणावर शुक्रवारी सकाळी एसटी बस आणि ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला, तर २० जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये तीन महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे.

गेवराईहून जालन्याकडे बस निघाली होती. बस शहापूरजवळ आली असता अंबडहून मोसंबी घेऊन येणाऱ्या ट्रकबरोबर समोरासमोर धडक झाली.  बसमध्ये एकूण २५ प्रवासी होते. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना रुग्णवाहिकांद्वारे अंबड व जालना येथील रुग्णालयात दाखल केले.

जालना-वडीगोद्री मार्गावरील शहापूरजवळील वळणावर बस आणि ट्रकच्या भीषण अपघातानंतर दोन्ही वाहनांची झालेली अवस्था.

दुचाकीला दिली हुलकावणी : अंबडहून बीडकडे मोसंबी घेऊन जाणाऱ्या आयशरचालकाने झिरपी फाट्यावर एका दुचाकीला हुलकावणी दिली होती.  या दरम्यान दुचाकीवरील पोते खाली पडल्याने आयशर चालकाने गाडी भरधाव चालवली. दोन किलोमीटरवर जात नाही तोच हा भीषण अपघात झाल्याचे अन्य वाहनधारकांनी सांगितले.