शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

शेतकऱ्यांवर संकट! अवकाळी पावसाच्या तडाख्याने गहू झाला आडवा, रब्बी पिकांचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2022 5:39 PM

मुबलक पाण्यामुळे आंबे व द्राक्ष बागा चांगल्या बहरात असतांना बदलत्या वातावरणामुळे नुकसानीची शक्यता आहे.

भोकरदन (जि.जालना) : भोकरदन शहरासह तालुक्यातील काही भागांत बुधवारी सकाळपासून विजांच्या कडकडाटासह जोरदार तर काही भागात रिमझिम पाऊस बरसला आहे. तर काही भागात वाऱ्याचा वेग अधिक असल्याने काढणीला आलेल्या रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

तालुक्याला गेल्या चार ते पाच वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसत आहे. कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाने शेतकरी हैराण झाले आहेत. गतवर्षी अतिवृष्टीमुळे खरिपाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. मात्र, मुबलक पाण्यावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गहू, हरभरा, कांदा सिड्स, शाळू, मका आदी रब्बी पिकांची लागवड केली. सध्या ही पिके सोंगणीस आली आहे. तर काही ठिकाणी सोंगणी सुरू आहे. माल घरी येण्याची तयारी सुरू असतानाच दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेकांनी गहू, हरभऱ्याच्या काढणीला सुरुवात केली आहे. तर अनेकांचे पीक शेतात उभे आहेत. त्यातच बुधवारी पहाटे भोकरदन शहरासह तालुक्यातील आनवा, धावडा, आडगाव, जळगाव सपकाळ, वाकडी, पोखरी, गोकुळ, आव्हाना, वालसावंगी, केदारखेडा, बरंजळा, तडेगाव, भायडी, कुकडी, विरेगाव आदी भागांत विजांच्या कडकडाटासह बेमोसमी पाऊस झाला. तर काही भागात वादळी वाऱ्यामुळे गव्हाचे पीक आडवे झाले आहे.

फळबागांना मोठा फटकाबेमोसमी पावसामुळे तालुक्यातील आंबे, द्राक्ष बागांना फटका बसण्याची शक्यता आहे. मुबलक पाण्यामुळे आंबे व द्राक्ष बागा चांगल्या बहरात असतांना बदलत्या वातावरणामुळे नुकसानीची शक्यता आहे. ढगाळ वातावरणामुळे गारवा निर्माण झाला आहे.

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरी