शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

दीड लाख शेतकऱ्यांची माहिती शासकीय वेबसाईटवर अपलोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 01:15 IST

राज्य शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ५५ हजार ६१४ शेतकऱ्यांची माहिती शासकीय पोर्टलवर अपलोड करण्यात आली

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ५५ हजार ६१४ शेतकऱ्यांची माहिती शासकीय पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. १५ फेब्रुवारीनंतर शासनाची कर्जमुक्तीसाठी पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिध्द होणार आहे. मात्र, अद्यापही जिल्ह्यातील तब्बल २ हजार ८३२ शेतक-यांनी आपल्या कर्जखात्याशी आधार नंबर लिंकिंग केला नसल्याची माहिती समोर आली आहे.आघाडी शासनाने २ लाखापर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आहे. या कर्जमाफी योजनेच्या पहिल्या टप्प्यात ज्या शेतक-यांच्या बँक खात्याशी आधार नंबर लिंक नाही त्यांनी आपला आधार नंबर बँक खात्याशी लिंक करावा, यासाठी प्रशासकीय, बँक पातळीवरून जनजागृती करण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यातील दोन लाखांच्या आतील कर्ज असलेल्या २ लाख ४ हजार ४६२ शेतक-यांपैकी ३१ हजार ५५४ शेतक-यांचे आधार नंबर कर्ज खात्याशी संलग्न नसल्याचे समोर आले होते. त्यानुसार राबविलेल्या प्रक्रियेत आजवर २८ हजार ७७२ शेतक-यांनी आपले आधार नंबर कर्जखात्याशी लिंकिंग करून घेतले आहेत. तर अद्यापही २ हजार ८३२ शेतक-यांचे नंबर कर्जखात्याशी लिंक झालेले नाहीत.आधार लिंकिंगची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बँकेमार्फत शासनाच्या पोर्टलवर लाभार्थी शेतक-यांची माहिती आपलोड करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यानुसार आजवर १ लाख ५५ हजार ६१४ शेतकºयांची माहिती शासकीय पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. ९१० शेतक-यांना लेखी पत्रकर्जमाफीस पात्र ठरणा-या शेतक-यांनी बँकेतील कर्ज खात्याशी आधार लिंकिंग करून घ्यावे, यासाठी प्रशासन, बँकांनी जनजागृती केली आहे. विशेषत: जिल्हा बँकेच्या तब्बल ९१० शेतक-यांना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने लेखी पत्र देण्यात आले आहेत. मात्र, यातील जवळपास १०० शेतक-यांनी आधार लिंकिंग केली असून, इतर शेतक-यांनी अद्यापही आधार लिंकिंग केले नसल्याचे समजते.समिती करणार तक्रारीचे निरसनशासनाने कर्जमुक्तीस पात्र शेतक-यांची यादी प्रसिध्द केल्यानंतर ती बँक, पतसंस्था, ग्रामपंचायत आपले सरकार केंद्रावर प्रसिध्द केली जाणार आहे. यादीत नाव असेल तर शेतकºयांनी आपले सरकार केंद्रावर जाऊन आधार नंबर आणि कर्जमाफी यादीतील आपला विशिष्ट नंबर देऊन प्रक्रिया पूर्ण करायची आहे. कर्जमुक्तीची रक्कम मान्य असेल तर होकार द्यावा अन्यथा आपली तक्रार आॅनलाईन पध्दतीने नोंदवावी. ही तक्रार आॅनलाईन पध्दतीने तात्काळ जिल्हा समितीकडे येणार असून, जिल्हा समिती या तक्रारीचे निरसन करणार आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाAdhar Cardआधार कार्डFarmerशेतकरी