शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनोज जरांगेंनी २८८ जागांवर उमेदवार उभे करावेत, आम्ही स्वागतच करू”; लक्ष्मण हाकेंचे आव्हान
2
टोलमाफी, २ नदीजोड प्रकल्पांना मंजुरीसह राज्य मंत्रिमंडळाने घेतले १९ मोठे निर्णय
3
अजितदादांच्या आमदाराचा पारा चढला; महायुतीतील मित्रपक्षाच्या नेत्यांनाच इशारा
4
"या कामाची पोचपावती जनता निवडणुकीत देईल"; टोलमाफीच्या निर्णयावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
5
PAK vs ENG : शाहीनला मोठा झटका! PCB ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता आफ्रिदीची लक्षवेधी पोस्ट
6
Surbhi Chandna : "रोज रात्री रडायची..."; १३ वर्षे डेट केल्यावर अभिनेत्रीला लग्न केल्याचा पश्चाताप, झाली भावुक
7
२०१९ नंतर पहिल्यांदाच एका दिवसात Dmart च्या शेअरमध्ये मोठी घसरण, गुंतवणूकदारांना कसली भीती?
8
बाबा सिद्दिकीच नाही तर या नेत्यांच्या हत्यांनीही हादरली होती मुंबई, समोर आला होता अंडरवर्ल्डचा हात
9
“CMपदाच्या चेहऱ्यापेक्षा महाभ्रष्ट महायुती सरकार घालवणे महत्त्वाचे”: बाळासाहेब थोरात
10
Rohit Sharma Hardik Pandya, Mumbai Indians IPL 2025: हार्दिक पांड्या, रोहित शर्मा अन् मुंबई इंडियन्स... जयवर्धने हेड कोच होताच आकाश चोप्राची मोठी भविष्यवाणी
11
जेव्हा करीनाने बहिणीला पहिल्यांदा सांगितलं होतं सैफबद्दल, तेव्हा करिश्माने दिली होती ही रिअ‍ॅक्शन
12
Kojagiri Purnima 2024: कोजागरी विशेष 'हे' लक्ष्मी मंत्र; करतील कर्जमुक्त; वाचा हे विशेष तोडगे!
13
Raj Thackeray reaction, Toll Free in Mumbai: "सरकारला उशिराने सुबुद्धी, निर्णय निवडणुकीपुरता न ठेवता..."; मुंबई टोलमाफीवर राज ठाकरेंची रोखठोक प्रतिक्रिया
14
Kojagiri Purnima 2024: कोजागरी पौर्णिमेला का खेळला जातो महाभोंडला? हा केवळ खेळ आहे की पुजा? वाचा!
15
इमर्जिंग आशिया चषकासाठी Team India ची घोषणा; तिलककडे नेतृत्व, ऋतुराज गायकवाडला डच्चू
16
'या' योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना करू शकतं १५ लाखांची मदत; जाणून घ्या अर्ज कसा करावा?
17
प्राजक्ता माळीच्या 'फुलवंती'ची कळी खुलेना? ३ दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
18
कोल्हापूर दौरा, अचानक समोर तालमीतला मित्र दिसला, मोहोळांनी गाडी थांबवून गळाभेट घेतली...
19
Reliance Jio नं लाँच केले २ नवे रिचार्ज प्लॅन्स; केवळ १ रुपयाचा फरक, कोणता आहे बेस्ट? 
20
स्वप्निलला राज्य सरकारकडून २ कोटी! वडील सुरेश कुसाळेंच्या नाराजीनंतर मोठी घोषणा

"लेकरं लेकरं करतो, मग इकडं काय बकरं आहेत का?"; जरांगेंवर जोरदार प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 6:49 PM

आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. मात्र, ओबीसीतून आरक्षण देऊ नये.

जालना/मुंबई - जालना जिल्ह्यातील अंबड येथे ओबीसी समाजाच्या मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांच्यासह सर्वच ओबीसी नेत्यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर वैयक्तीक टीका केली. छगन भुजबळ यांनी त्यांचं शिक्षण किती आणि त्यांना समजावायला न्यायमूर्ती जातात, असे म्हणत तो पाचवी तरी शिकलाय का, असा सवाल केला. तसेच, हा छगन भुजबळ स्वकष्टाचं खातो. तुझ्यासारखं सारसऱ्याच्या घरी तुकडा मोडत नाही, असा टोलाही भुजबळ यांनी लगावला. दुसरीकडे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही जरांगे पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला. 

आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. मात्र, ओबीसीतून आरक्षण देऊ नये. ५६ मराठा मोर्चे निघाले पण आम्ही कुणाला विरोध केला नाही. मात्र आम्ही कुणाचं घरं, दारं जाळली नाहीत, असे भुजबळ यांनी म्हटले. तर, विजय वडेट्टीवार यांनी अंबड येथील सभेतून ओबीसी समाजाची परिस्थिती समजावून सांगितली. यावेळी, जरांगे यांच्यावर जोरदार प्रहार केला. सारखं, लेकरं.. लेकरं.. करतो मग इकडं काय बकरं आहेत का, कापायला? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. तसेच, काहीजण म्हणतात आमच्याकडे जमिनी उरल्या नाहीत. मराठा २० एकरवरुन ५ एकरवर आलाय. मग, ज्यांच्याकडे जमिनीच नाहीत, जे भूमीहीन आहेत, त्यांचं काय?, त्यांनी कसं जगायचं?, असा सवालही विजय वडेट्टीवार यांनी अंबड येथील सभेतून केला आहे. 

दरम्यान, आता जरांगे पाटलांनी सांगलीतील सभा संपताच छगन भुजबळ यांच्या टीकेला प्रत्यूत्तर दिले. छगन भुजबळ हे वादग्रस्त वक्तव्य करून राज्यात दंगली पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप पाटलांनी केला आहे. तसेच, यापुढे आपण त्यांना किंमतच देणार नाही. राजकीय नेत्यांनी कितीही प्रयत्न केला तरी मराठा आणि ओबीसी यामध्ये कोणत्याही प्रकारचा संघर्ष निर्माण होणार नाही, असे जरांगे यांनी म्हटले. मात्र, छगन भुजबळ हे वादग्रस्त वक्तव्य करून राज्यात दंगली पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे षडयंत्र यशस्वी होणार नाही, असेही मनोज जरांगे यांनी म्हटले. 

भुजबळांवर जरांगेंचा पलटवार

छगन भुजबळ हे माझ्यावर वैयक्तिक टीका करत असून ते खालच्या पातळीवरच राजकारण करत आहेत. माझ्यावर टीका करण्या अगोदर तुम्ही पैसे खावून, जेल भोगून आला आहात याची आठवण तुम्हाला असू दे, असा टोलाही जरांगे पाटील यांनी लगावला. तुम्ही टीका केली तर, तुम्हाला उत्तर देण्यासाठी आम्ही कच्चे नाहीत. या राज्यात आम्ही वातावरण खराब होऊ देणार नाही. आता आम्ही देखील ५० टक्के आहोत. लोकांचे पैसे खाता, रक्त पिता का? मग तुम्हाला कोण देव मानणार आहे. मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही, त्यामुळे मराठा बांधवांनी सुध्दा एक डिसेंबर २०२३ पासून प्रत्येक गावात साखळी उपोषण करावे, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले.  

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण