शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

वॉटर ग्रीड मराठवाड्यासाठी वरदानच - बबनराव लोणीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 14:04 IST

आम्ही ही योजना करतोना देशातीलच नव्हे तर परदेशातील तज्ज्ञांकडून अभ्यास करून नंतरच ही योजना अमलात आणण्याचा निर्णय घेतला होता

जालना : मरावाड्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणारी वॉटर ग्रीड योजना व्यवहार्य नसल्याचा मुद्दा पुढे करून ही योजना रद्द करण्याच्या सरकारच्या हालचाली खेदजनक आहेत, आम्ही ही योजना करतोना देशातीलच नव्हे तर परदेशातील तज्ज्ञांकडून अभ्यास करून नंतरच ही योजना अमलात आणण्याचा निर्णय घेतला होता; परंतु अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही योजना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आखल्याचा आरोप करून ती व्यवहार्य नसल्याचे सांगितले. त्यात तथ्य नसल्याचा दावा आ. तथा  माजी पाणीुपरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी शुक्रवारी येथे आयोजित पत्र परिषदेत केला. 

मराठवाडा हा कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. या भागातील धरणांना जोडून ज्या भागात पाण्याची कमतरता निर्माण होईल ते पाणी त्या भागात ते वळविण्यासाठी ही योजना आम्ही आखली होती. यासाठी तज्ज्ञांकडून गेल्या ३५ वर्षांच्या पर्जन्यमानाचा अभ्यास करून आराखडा तयार केला आहे. ही योजना निवडणुकांपूर्ची म्हणजेच दोन वर्षापासून यावर काम सुरू केले आहे. यासाठी आपण स्वत: इस्त्राईल, आॅस्ट्रेलिया, श्रीलंकासह गुजरात, तेलंगणा या ठिकाणच्या अशा प्रकारच्या योजनांना भेटी देऊन अभ्यास केला. यावेळी जीवन प्राधिकरण विभागातील तज्ज्ञ आमच्या सोबत होते. त्यामुळे यात आमचा कुठलाच राजकीय स्वार्थ नसल्याचे ते म्हणाले. 

दरम्यान या योजनेसाठी आम्ही जरी २५ हजार कोटी लागणार आहेत, असे नमूद केले होते. परंतु एवढे पैसे सध्या देणे शक्य नसले तरी सरकारने आगामी अर्थसंकल्पात या योजनेसाठी ५०० कोटी रूपये तरतूद करून ही योजना सुरू ठेवावी असा आमचा आग्रह राहणार आहे. यासाठी मराठवाड्यातील सर्व आ. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना या योजनेचे मराठवाड्यासाठीचे महत्व आणि गरज पटवून देणार आहोत. एवढे करूनही जर काही झाले नाही, तर मात्र आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासह न्यायालयीन लढाई देखील लढणार असल्याचे लोणीकरांनी स्पष्ट केले. 

वीज बिलाचा मुद्दा गौण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजने संदर्भात वीज बिलाचा मुद्दा उपस्थित केला. परंतु ही योजना राबवितांना यात यापूर्वीच ५० टक्के सौर उर्जेचा वापर करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे संपूर्ण वीजेवरच ही योजना चालणार नाही हेही पवार यांनी लक्षात घ्यावे असे लोणीकर म्हणाले. आज या योजनेच्या निविदाही निघाल्या असून, त्यात अनेकजण गुंतवणूक करण्यास तयार असल्याचे ते म्हणाले.  

टॅग्स :Babanrao Looneykarबबनराव लोणीकरWaterपाणीJalanaजालनाMarathwadaमराठवाडा