शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
2
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा
4
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?
5
इराण इस्रायलवर हल्ला करणार? सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले,...
6
शरद पवारांकडून मोहोळमध्ये अनपेक्षित धक्का; अनेकांना बाजूला सारत रमेश कदमांच्या मुलीला उमेदवारी!
7
Bandra Stampede: महाराष्ट्रातील ७ स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उचलले मोठे पाऊल
8
"ठाकरे गटाच्या पहिल्या यादीतील १७ उमेदवार आमचे नेते", देवेंद्र फडणवीस यांचा सूचक दावा
9
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
10
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांची मोठी खेळी; अभिनेत्रीच्या पतीला दिली उमेदवारी
11
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
12
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?
13
जिम ट्रेनरने केली महिलेची हत्या, 'दृष्यम' स्टाईलने थेट डीएमच्या निवास्थानाजवळ लपवला मृतदेह, असं फुटलं बिंग 
14
विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल? आकड्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
15
Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती
16
BMW कारमधून आली अन् फ्लॉवर पॉट चोरून घेऊन गेली; महिलेचा कारनामा कॅमेऱ्यात कैद
17
बांगलादेशी हिंदूंचा जीव धोक्यात! "नोकरी सोडा अन्यथा...", कट्टरतावाद्यांकडून दिल्या जातायत धमक्या 
18
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
19
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
20
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे

धरण आटल्याने पाणीटंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2018 12:47 AM

भोकरदन तालुक्यातील शेलूद येथील धामणा धरण आटल्याने परिसरातील दहा गावांवर आतापासूनच पाणीटंचाईचे संकट घोघांवत असल्याने नागरिकांत चिंता पसरली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कलेहा : भोकरदन तालुक्यातील शेलूद येथील धामणा धरण आटल्याने परिसरातील दहा गावांवर आतापासूनच पाणीटंचाईचे संकट घोघांवत असल्याने नागरिकांत चिंता पसरली आहे.येथील धरणातून लेहा, जळगाव सपकाळ, शेलूद अन्वा, हिसोडा, वडोद तांगडा, पिंपळगाव रेणुकाई, पारध खुर्द, पारध बु, अवघडराव सावंगी आदी दहा गावांना शेलुदच्या धरणावरुन पाणी पुरवठा होतो. मात्र गेल्या चाळीस वर्षापासून धरणातील गाळ काढण्यात आला नसल्याने धरणात पुरेशा प्रमाणात पाणी साठण्यास अडचणी आल्या. यंदा परिसरात पावसाने हुलकावणी दिल्याने धरण पूर्णक्षमतेने भरले नाही. सुरुवातीच्या पावसाने धरणात पडलेले खड्डे बुजून गेले. परतीचा पाऊस पडेल अशी आशा नागरिकांना लागली आहे. मात्र अद्यापही पावसाचा पत्ता नसल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. सध्या पावसाचे दिवस सुरु असतांना उन्हाळ्यासारखे उन परिसरात पडत आहे.यामुळे धरणात साचलेलेल डबके सुध्दा आटून गेले आहे. आतापासूनच पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. परिसरातील अनेक गावात तर नागरिकांनी टँकरचे विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. पिण्याची पाण्याची परिस्थिती चिंताजनक बनली आहे. नदी नाले कोरडे असल्याने सिंचनाचा प्रश्न गंभीर झाला आहे. परिणामी कपाशी, मिरची पिकावर अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.यामुळे प्रशासना आतपासूनच परिसरातील पाणी टंचाईवर उपायोजना करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. तसेच टँकरणे पाणी पुरवठा करण्याची मागणी आहे.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाई