शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

चार दिवसाआड होणार शहरवासीयांना पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 00:45 IST

लवकरच शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नवीन जालना भागाला पाणीपुरवठा करणारा घाणेवाडी प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. मात्र, समृद्धी महामार्गाच्या कामात फुटलेली पाईपलाईन पाणीपुरवठा सुरळीत करण्यात अडथळा निर्माण झाली होती. या फुटलेल्या पाईपलाईन दुरुस्तीचे काम पालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. हे काम अंतीम टप्प्यात असून, लवकरच शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.गतवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत सरासरीच्या अपेक्षित पाऊस झालेला नव्हता. जुना जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी प्रकल्पात अपुरा पाणीपुरवठा होता. तर नवीन जालना भागाला पाणीपुरवठा करणारा घाणेवाडी प्रकल्प कोरडाठाक पडला होता. त्यामुळे शहरातील पाणीवितरण व्यवस्थेवर परिणाम झाला होता. जायकवाडी प्रकल्पातून मिळणाºया पाण्यावर पालिकेने पाणीवितरणाचे नियोजन केले होते. मात्र, अनेक भागात दहा ते बारा दिवसानंतर पाणीपुरवठा होत होता. मात्र, परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आणि जायकवाडी प्रकल्पासह घाणेवाडी प्रकल्प ओव्हरफ्लो झाला. त्यामुळे आता जुना जालना व नवीन जालना भागातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.नवीन जालना भागाला घाणेवाडी प्रकल्पातून पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, समृध्दी महामार्गाच्या कामात या पाणीपुरवठा योजनेवरील पाईप फुटले होते. घाणेवाडी प्रकल्प भरल्याने नवीन जालना भागाचा पाणीप्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे फुटलेल्या पाईपलाईनच्या दुरूस्तीचे कामही पालिकेकडून हाती घेण्यात आले आहे. हे काम चार ते पाच दिवसात पूर्ण होण्याची आशा पालिकेकडून वर्तविण्यात आली आहे. त्यानंतर जुना जालनासह नवीन जालना भागात चार दिवसाला पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली.

टॅग्स :Jalana Muncipalityजालना नगरपरिषदWaterपाणीcivic issueनागरी समस्या