शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
2
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
3
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
4
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
5
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
6
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
7
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
8
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
9
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
10
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
11
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
12
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
13
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
14
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
15
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
16
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
17
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
18
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
19
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
20
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा

१०० कोटी देऊनही कंत्राटदार न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 00:28 IST

एजन्सीने जवळपास ४०० किलोमीटरपेक्षा अधिक पाईपलाईन अंथरली. त्यापोटी पालिकेने एक अब्ज रूपये संबंधित कंत्राटदाराला दिले होते. परंतु आणखी जवळपास पाच कोटी रुपये वाढवून द्यावेत यासाठी कंत्राटदाराने न्यायालयात धाव घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालन्यातील पाणीप्रश्न निकाली काढण्यासाठी २०१२ मध्ये २५० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. त्यासाठी पैठण येथील जायकवाडी धरणातून जालन्याच्या वेशीपर्यंत पाणी आणले होते. परंतु हे पाणी जालन्यातील विविध विभागात पोहोचविण्यासाठी अंतर्गत जलवाहिनी टाकण्यासाठी नाशिक येथील एका एजन्सीला हे कंत्राट दिले होते. या एजन्सीने जवळपास ४०० किलोमीटरपेक्षा अधिक पाईपलाईन अंथरली. त्यापोटी पालिकेने एक अब्ज रूपये संबंधित कंत्राटदाराला दिले होते. परंतु आणखी जवळपास पाच कोटी रुपये वाढवून द्यावेत यासाठी कंत्राटदाराने न्यायालयात धाव घेतली आहे.जालना शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी जायकवाडी योजना कार्यान्वित केली होती. ही योजना अत्यंत खर्चिक असून, त्यात पुन्हा अंबड पालिकेला पाणी देण्याचा मुद्दा समाविष्ट करण्यात आल्याने जालना पालिकेची डोकेदुखी कायम आहे. आज अंबड पालिकेकडून जालना पालिकेला पाणी घेण्यासाठी ठरलेली रक्कम देत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. जालन्यासाठी जायकवाडी योजनेतून अंबड मार्गावरील इंदेवाडी येथील जलकुंभापर्यंत पाणी आले होते. परंतु नंतर हे पाणी जालन्यातील विविध भागात पोहोचविण्यासाठी नव्याने अंतर्गत जलवाहिनी टाकण्यासाठी पालिकेने निविदा मागविल्या होत्या.त्यानुसार हे काम नाशिक येथील एका एजन्सीला देण्यात आले. या एजन्सीने गेल्या दोन वर्षात शहराच्या विविध भागांत पाणी पुरविण्यासाठी जलवाहिनी अंथरण्यात आली. या कामापोटी संबंधित कंत्राटदारास पालिकेने आतापर्यंत ९९ लाख रूपयांपेक्षा अधिकची रक्कम बिल म्हणून दिली आहे.परंतु ही कमी असल्याचे कारण पुढे करत संबंधित एजन्सीीने आणखी अतिरिक्त पाच कोटी रूपयांची वाढीव रक्कम द्यावी, अशी मागणी पालिकेकडे केली. परंतु पालिकेने ती मान्य केली नाही. त्यामुळे त्या एजन्सी चालकाने थेट न्यायालयात धाव घेतली आहे.ज्यावेळी या योजनेचे टेंडर झाले, त्यावेळचे दर आणि नंतर केलेल्या कामांचे दर हे चालू बाजारभावाप्रमाणे द्यावे अशी मागणी करण्यात आली. परंतु ९९ लाख रूपये देऊनही जर आणखी वाढीव रक्कम देणे आम्हाला आर्थिक दृष्ट्या परवडत नाही, असे पालिकेचे म्हणणे आहे. त्यातच हे देयक संबंधित कंत्राटदाराला देताना थर्ड पार्टी आॅडिट केल्यावरच ते दिल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.योजना : घनकचऱ्यासाठी अडीच कोटी मंजूरजालन्यातील सामनगाव येथील घनकचरा प्रकल्प चक्क दहा वर्षानंतरही या ना त्या कारणाने रखडलेला आहे. पूर्वी हा प्रकल्प १६ कोटी रूपयांचा होता. परंतु त्यात काही त्रुटी राहिल्याने जालना पालिकेने वाढीव नवीन डीपीआर मंजूर करण्यासाठीचा प्रस्ताव पाठिविला होता.त्यानुसार आता या प्रकल्पासाठी वाढीव दोन कोटी ७१ लाख रूपये मंंजूर झाले असून, हे काम आता लवकरात लवकर पूर्ण होईल, यासाठीचे आमचे प्रयत्न सुरू असल्याचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी सांगितले.

टॅग्स :Jalana Muncipalityजालना नगरपरिषदWaterपाणीCourtन्यायालय