शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
2
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
3
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
5
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
6
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
7
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
8
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
9
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
10
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
12
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
13
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
14
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
15
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
16
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
17
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
18
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
19
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
20
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 

सरसकट पंचनामे सारखे नुकसान दिसत नाही, परंतु सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 6:22 PM

पिक विमा कंपन्यांना यामध्ये जोडण्यात येणार असून लवकरच संयुक्त पंचनामे करण्यात येतील

बदनापूर ( जालना) : पावसाने झालेल्या नुकसानीचे येत्या पंधरा दिवसात पंचनामे होतील. त्यानंतर मदतीचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील. सरसकट पंचनामे सारखे नुकसान दिसत नाही, मात्र ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहेत त्या सर्वांना नुकसान भरपाई मिळेल, असे आश्वासन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले

अतिवृष्टी झालेल्या बदनापूर तालुक्यातील अंबडगाव शिवारात आज कृषीमंत्री अब्दुल सत्तार, माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी भेट दिली. येथे दत्तू रावसाहेब गोजे या शेतकऱ्याच्या गट क्रमांक 53 मध्ये नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची त्यांनी पाहणी केली. यावेळी ते म्हणाले की,  गेल्या चार वर्षांपासून या भागात नेहमीच अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. याचे कारण शोधण्यासाठी एका समितीची गरज आहे. पावसाने झालेल्या नुकसानीचे वेगवेगळे भाग आहेत. तरीही ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांचे पंचनामे पंधरा दिवसापर्यंत करण्यात येतील. राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीबाबत निर्णय घेतील. सरसकट पंचनामे सारखे नुकसान दिसत नाही परंतु नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय व मदत निश्चित मिळेल.  फळबागांचे सुद्धा पंचनामे होतील. पिक विमा कंपन्यांना यामध्ये जोडण्यात येणार असून लवकरच संयुक्त पंचनामे करण्यात येतील, असे आश्वासन सत्तार यांनी दिले.

यावेळी माजीमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, खोतकर राजेश, महादू जऱ्हाड, गीते निवृत्ती, डाके नंदकिशोर, दाभाडे श्रीरंग, जऱ्हाड ताराचंद, फुलमाळी शिवाजी, जऱ्हाड भगवान, म्हात्रे संतोष, वरकड बाबुराव, मिर्झा शेख अजीज, कोल्हे जगदीश आदींसह अनेक शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी अंबडगाव, धोपटेश्वर, देवगाव कस्तुरवाडी व रोशनगाव मंडळातील पिकांची हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. यामध्ये फळबाग, कापूस, सोयाबीन, तूर अशा अनेक पिकांचे नुकसान झाले असून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशा मागणीचे निवेदन कृषिमंत्र्यांना दिले.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारagricultureशेतीRainपाऊसJalanaजालना