शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
2
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
3
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
4
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
6
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
7
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
8
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
9
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
10
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
11
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
12
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
13
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

नागरी समस्यांचा पोळा कोण फोडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 12:25 AM

काळ्या आईला हिरवा शालू पांघरता यावा म्हणून सर्जा-राजा हे वर्षभर राबराब राबतात या राबणाऱ्या बैलांनाही एक दिवस पोळा सणाच्या निमित्ताने सन्मान देण्यात येतो. त्यांच्यासाठी वर्षातून एकदाच पुरणपोळी केली जाते, त्यांची सजवून मिरवणूक काढण्यात येते. एरवी नेहमी चाबकाचे फटकारे खात ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता आपल्या बळीराजासाठी तो राबराब राबतो. त्याचा सन्मान होत असल्याने भारतीय संस्कृती किती महान आहे, हेच या पोळा सणातून दिसून येते.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : काळ्या आईला हिरवा शालू पांघरता यावा म्हणून सर्जा-राजा हे वर्षभर राबराब राबतात या राबणाऱ्या बैलांनाही एक दिवस पोळा सणाच्या निमित्ताने सन्मान देण्यात येतो. त्यांच्यासाठी वर्षातून एकदाच पुरणपोळी केली जाते, त्यांची सजवून मिरवणूक काढण्यात येते. एरवी नेहमी चाबकाचे फटकारे खात ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता आपल्या बळीराजासाठी तो राबराब राबतो. त्याचा सन्मान होत असल्याने भारतीय संस्कृती किती महान आहे, हेच या पोळा सणातून दिसून येते.गावातील सर्व सजविलेल्या बैलांना हनुमान मंदिरा समोर आणून त्यांची सार्वजनिक पूजा केली जाते आणि नारळ फोडून पोळा फुटला असे जाहीर केले जाते. नंतर धन्याच्या घरी बैलांचे औक्षवण केले जाते. आता तुम्ही म्हणाल पोळा सणाचा आणि जालना शहरातील नागरी समस्यांचा संबंध कसा काय जोडता, पोळा या एकाच सणासाठी फुटला हा शब्दप्रयोग केला जातो.तर दुसरे म्हणजे दहीहंडी फुटली असे उच्चारले जाते. हे दोन्ही जवळपास जोडून येतात. त्यामुळे सणाशी नाते जोडले ते जालन्यातील नागरी समस्यांचे या सुटता सुटेनात आणि फुटेनातही अशी स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेले जालना शहर गेल्या पाच वर्षापासून पथदिवे बंद असल्याने अंधारात चाचपडते आहे. गणेश उत्सव, रमजान इद, दिवाळी असे काही सण आल्यावर हे पथदिवे सुरू होतात आणि नंतर पुन्हा जैसे थे. पथदिव्यांप्रमाणेच घनकचरा प्रकल्पाचे झाले आहे. स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी त्यांच्या पहिल्या आढावा बैठकीत तीन महिन्यात हा प्रकल्प पूर्ण न झाल्यास संबंधित कंपनीविरूध्द गुन्हे दाखल केले जातील अशी घोषणा केली होती. मात्र याला आता साडेतीनवर्ष झाले आहेत. पाणीपुरवठ्याची सध्या ऐन पावसाळ्यातही शहराच्या काही भागात दहा ते पंधरा दिवसाआड पाणी मिळत आहे. या तीन्ही समस्या नागरिकांच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. आणि आता या समस्या सोडविण्याची जबाबादी ही पालिकेची असून, संपूर्ण राज्यात सर्वात जास्त मतांनी नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल यांना जालनेकरांनी निवडून दिले आहे. त्यांच्याकडून आता मोठ्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यांच्या पातळीवर त्या प्रयत्न करत असल्याचे दिसत असले तरी, त्यात आणखी वाढ करण्याची गरज जनतेतून व्यक्त होत आहे. विरोधी पक्ष असलेले शिवसेना आणि भाजप हे सर्वसाधारण सभेत त्यांच्याशी संबंधित मुद्यांवर थोडाफार गोंधळ करून जोर आजमायीश करतात परंतू नंतर विविध प्रकारच्या विकास कामांवरून सर्वपक्षीयांचे हातात-हात घालून सर्वकाही आलबेल सुरू असल्याचे दर्शन घडते.एकूणच विरोधी पक्ष केवळ खासगीत चर्चा करताना आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून देऊन मन हलके करतात. परंतु प्रत्यक्षात कोणीच कोणाविरूध्द दोन हात करण्याच्या स्थितीत नसते. राहिला गरीब बिचा-या जनतेचा मुद्दा ती रोजजच्याच आपल्या राहाटगाडग्यातून त्यांना उसंत मिळत नाही. त्यामुळे ना या शहरात आंदोलन होत ना कोणी पेटून उठत. त्यामुळे राजकारणी आणि प्रशासनाचे चांगलेच फावते. चलता है...आणि समस्या हा प्रश्न न संपणारा असतो, असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने कोणाचीच भीती अथवा दबावगट नसल्याने जालनेकरांच्या समस्यांचा पोळा फोडणार कोण असा प्रश्न अनुत्तरित राहतो.त्यामुळे मग जालनेकरांचे जगने म्हणजे ठेवीले अनंत तैसेची राहावे या संत वचनाप्रमाणे बनले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमcivic issueनागरी समस्या