शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
3
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
4
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
5
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
6
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
7
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
8
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
9
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
10
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
11
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
12
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
13
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
14
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
15
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
16
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
17
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
18
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

विकास योजनांना मिळेल का सरकारचे बळ? जालना जिल्ह्याची २०० कोटींची मागणी

By शिवाजी कदम | Published: September 16, 2023 11:48 AM

जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात वाढ करणे, प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयासाठी निधीची गरज आहे.

जालना : छत्रपती संभाजीनगर येथील मंत्रिमंडळ बैठकीसाठी जालना जिल्हा प्रशासनाने सुमारे २०० कोटींचे प्रस्ताव तयार केले आहेत. यात मुख्यत्वे जिल्ह्यात रेशीम प्रशिक्षण केंद्र स्थापन करणे, अंबड येथील मत्स्योदरी मंदिर परिसराच्या विकासासह जालना शहरात सीसीटीव्हीसाठी निधीची मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात वाढ करणे, प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयासाठी निधीची गरज आहे.

जिल्ह्यात रेशीम शेतीला सुगीचे दिवस आले आहेत. परंतु, येथे रेशीमवर प्रक्रिया करणारे उद्योग नसल्याने येथे उत्पादित झालेल्या मालावर प्रक्रिया करण्यासाठी इतर शहरांमध्ये पाठविण्यात येतो. रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी येथे रेशीम पार्क उभारण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. तसेच, शेतकऱ्यांना रेशीम शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे यासाठी प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचेदेखील नियोजन करण्यात आले आहे. रेशीम पार्क आणि प्रशिक्षण केंद्रासाठी २५ कोटींची मागणी प्रस्तावित करण्यात आली आहे.

शहरात सीसीटीव्ही कॅमेरेकेंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत राज्यातील काही शहरांमध्ये आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. याच धर्तीवर जालना शहरात सीसीटीव्ही बसविण्यासाठी पाच कोटींच्या निधीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. परंतु, ते कालबाह्य झाल्याने नवीन कॅमेरे बसवण्यासाठी निधीची मागणी करण्यात आली आहे.

जल शुद्धीकरणासाठी निधीची गरजजायकवाडी येथून जालना शहरात आलेल्या जलवाहिनीच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी निधीची मागणी करण्यात आली आहे. तसेच, जाफराबाद, भोकरदन शहरांसाठी नवीन पाणीपुरवठा योजना, मोतीबाग सुशोभीकरण, घनकचरा प्रकल्प, रस्ते रुंदीकरण यासाठी निधी मिळण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

मनोरुग्णालयाची घोषणा हवेतमनोरुग्णांना स्थानिक पातळीवर उपचार मिळण्यासाठी काही वर्षांपूर्वी येथे आधुनिक मनोरुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, रुग्णालय उभारण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. प्रस्तावित मंत्रिमंडळ बैठकीत मनोरुग्णालयास निधी मिळेल अशी आशा आहे.

मंदिर विकासासाठी निधीची गरजअंबड येथील मत्स्योदरी मंदिर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झालेली आहे. राज्यातील विविध भागांतून येथे भाविक दर्शनसाठी येत असतात. परिसरात भाविकांना विविध सुविधा उपलब्ध करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. निधी मिळण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून तयार करण्यात आला आहे.

सिंचन प्रकल्पाची क्षमता वाढजालना जिल्ह्यात लहान-मोठे असे ६४ जलसिंचन प्रकल्प आहेत. यातील अनेक प्रकल्पांची क्षमता कमी असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही. या प्रकल्पांची क्षमता वाढवण्याची गरज निर्माण झालेली आहे. सिंचनाचा अनुशेष असल्याने या प्रकल्पांची क्षमता वाढ करण्यासाठी अपेक्षित निधी मिळू शकलेला नाही.

शेतकरी एमआयडीसीचा प्रस्तावपरतूर तालुक्यातील आष्टी येथे शेतकरी एमआयडीसी उभारण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात येणार आहे. शेतकरी औद्योगिक क्षेत्रासाठी निधीची तरतूद झाल्यास येथील शेतकऱ्यांच्या मालावर स्थानिक स्तरावर प्रक्रिया करणे शक्य होईल.

टॅग्स :JalanaजालनाState Governmentराज्य सरकार