शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

युवक-युवतींनी समाज, कुटुंबाप्रती संवेदनशील राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 01:07 IST

समाज, कुटुंबाप्रती युवकांनी संवेदनशील रहावे, असा सूर शहरात आयोजित अग्र- महाकुंभमधील चर्चासत्रात सहभागी वक्त्यांमधून निघाला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आजच्या युवकांकडे इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे. परंतु, कम्युनिकेशन (आपापसातील संवाद) हरपत चालला आहे. ‘आपण आणि आपले बरे’, असे म्हणणाऱ्यांची संख्या वाढत आहे. हे कुठे तरी थांबविण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा. तसेच समाज, कुटुंबाप्रती युवकांनी संवेदनशील रहावे, असा सूर शहरात आयोजित अग्र- महाकुंभमधील चर्चासत्रात सहभागी वक्त्यांमधून निघाला.दानकँुवर महाविद्यालयातील प्रांगणात अग्रवाल समाजाचे २४ वे प्रांतीय संमेलन अर्थात अग्र- महाकुंभ आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन शनिवारी सकाळी ज्येष्ठ पदाधिकारी विजय चौधरी, महामंत्री गोपाल अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यानिमित्त आयोजित ‘युवा चेतना’ या चर्चासत्रात छत्तीसगड येथील प्रसिध्द वक्ते हरीश मंत्री आणि पुणे येथील द्वारकाप्रसाद जालान यांनी विचार मांडले. युवकांनी समाजाप्रती संवेदना ठेवली पाहिजे. समाजाचे आणि कुटुंबाचे आपण घटक असल्याने त्यांचा विचार होणे गरजेचे आहे. आज माणसाकडे स्वत:साठी वेळ आहे. परंतु, समाजासाठी वेळ खर्ची करण्यास आजचा युवक धजावत नाही.एकूणच आज संपर्काची अनेक साधने उपलब्ध असली तरी आपल्या मनात दडलेले दु:ख हे कोणाजवळ व्यक्त करावे, अशी विश्वासू व्यक्ती सापडत नाही. त्यामुळे वडील, मुलगा, नोकर हे देखील एक चांगले मित्र होऊ शकतात. ज्यांच्या जवळ तुम्ही तुमच्या भाव-भावना आणि दु:ख व्यक्त करू शकता. आयुष्यात काही मिळविण्याच्या नादात जगणं विसरत चाललो आहोत. याचे भान कुणालाही नाही. त्यामुळेच जे जीवन मिळाले आहे ते जास्तीत जास्त आनंदाने कसे जगता येईल, याचा विचार करणे गरजेचे आहे.आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहावेयावेळी मंत्री यांनी सांगितले की, आपल्याजवळ जे काही आहे, त्या पलीकडेही मोठे जग आहे. त्याकडे लक्ष वेधताना आयुष्याकडे बघताना सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे, त्यासाठी दृष्टीकोन बदलणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार तथा अग्रवाल प्रांतीय समाजाचे अध्यक्ष किरण अग्रवाल यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुभाष देविदान, उद्योजक घनशाम गोयल, दिनेश भारूका, सरिता बगडिया, पुरूषोत्तम जयपुरिया, संजय अग्रवाल, जितेंद्र अग्रवाल, डॉ. अनिता तवरावाला, संदीप गिंदोडिया, मनिष तवरावाला हे प्रयत्न करत आहेत.संमेलनात आज अनेक ठरावजालना येथे २४ वे अग्रवाल संमेलन भरविण्यामागचा उद्देश सकारात्मक दृष्टीकोन वाढविणे आणि ज्या काही समाजामध्ये अनिष्ट प्रथा, रूढी आहेत, त्यांना तिलांजली देऊन नवीन समाज निर्मिती करण्यासाठी रविवारी या संमेलनात विविध ठराव संमत करण्यात येणार आहेत.

टॅग्स :communityसमाजSocialसामाजिकFamilyपरिवार