शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
2
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी
3
PM Modi Flags off Mumbai Metro 3: मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न पूर्ण, मोदींच्या हस्ते मेट्रो-३ चं लोकार्पण; पंतप्रधानांचा बीकेसी ते सांताक्रूझ प्रवास!
4
IND vs PAK: टॉस जिंकून पहिली बॅटिंग की बॉलिंग? भारत-पाकिस्तान मॅचसाठी कसं असेल पिच?
5
भारताचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच पाकिस्तानात जाणार; बातमी ऐकून फारूख अब्दुल्ला खुश!
6
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
7
जम्मू-कश्मीरला मिळणार पहिला हिंदू मुख्यमंत्री? भाजपची मोठी रणनीती
8
T20 WC 2024 : चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे एकतर्फी वर्चस्व! श्रीलंकेचा उडवला धुव्वा; मिचेल स्टार्कचीही हजेरी
9
मतदान करून येणाऱ्या वृद्धाला विचारलं मत कुणाला दिलं? काँग्रेसचं नाव घेताच बेदम मारलं
10
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
11
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
12
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
13
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
14
अजितदादांना धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार?
15
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच
16
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
17
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले
18
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  
19
पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण
20
भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?

नेरी नाका स्मशानभूमीत सहा दिवसांत १६२ जणांवर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 4:15 AM

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना वाढत असताना मृतांची संख्यादेखील गेल्या वर्षापेक्षा या वर्षी अधिक पटीने वाढलेली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना वाढत असताना मृतांची संख्यादेखील गेल्या वर्षापेक्षा या वर्षी अधिक पटीने वाढलेली आहे. शहरातील नेरी नाका स्मशानभूमीत गेल्या सहा दिवसांत तब्बल १६२ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून, यामध्ये २३ कोरोना रुग्णांचा समावेश आहे. मात्र, इतर १३९ जणांचा मृत्यू कशामुळे झाला आहे, हा प्रश्न कायम आहे. कोणत्याही काळात शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू झालेले नाहीत. तसेच प्रशासनाकडून हे मृत्यू कोरोनामुळे झालेले नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, मृतांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या लपविली जात आहे का, असाही प्रश्न आता निर्माण आहे.

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याआधी नेरी नाका स्मशानभूमीत दिवसाला आठ ते दहा मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात होते. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर मार्च २०२० ते जानेवारी २०२१ पर्यंत दिवसाला सरासरी १४ जणांवर अंत्यसंस्कार या ठिकाणी केले जात होते. मात्र फेब्रुवारी महिन्यापासून शहरात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर मृतांच्या संख्येत वाढ झालेली आहे.

कोरोनाव्यतिरिक्त इतर आजाराने मृत्यू झालेल्यांची संख्या वाढली

शहरात कोरोनाव्यतिरिक्त इतर कारणांनी मृत्यू झालेल्या १३९ जणांवर गेल्या सहा दिवसांत केवळ नेरी नाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात इतर कारणांमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आतापर्यंत वाढलेली नव्हती. मात्र, आता ही संख्या वाढलेली असल्याने या कारणांचा शोध घेणेदेखील गरजेचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, इतर कारणांमुळेदेखील मृत्यू वाढत आहेत. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

प्रशासन आकडेवारी लपवते आहे का?

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसाला अकराशेपर्यंत आहे. तर जिल्हाभरात दररोज १४ हून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. मात्र, जळगाव शहरातच एका दिवसात केवळ नेरी नाका स्मशानभूमीत दिवसाला २५ हून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत.

नेरी नाका स्मशानभूमी ही केवळ कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कारासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. शहरात शिवाजीनगर, मेहरूण व पिंप्राळा परिसरातदेखील स्मशानभूमी असून, या ठिकाणीदेखील अनेकांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. या स्मशानभूमींवरील अंत्यसंस्कार होणाऱ्यांचा विचार केला तर ही संख्या दिवसाला ५० पर्यंत पोहोचत आहे. प्रशासनाकडून शहरात दिवसाला कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या केवळ ४ इतकी दाखविले जात आहे. शहरात होणारे एकूण मृत्यू व प्रशासनाकडून सांगण्यात येणारे मृत्यू या आकडेवारीत मोठा फरक जाणवत आहे. यामुळे प्रशासन आपले अपयश लपविण्यासाठी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या लपवत आहे का, असा प्रश्न यामुळे निर्माण होत आहे.

नेरी नाका स्मशानभूमीवर या सहा दिवसांत झालेले अंत्यसंस्कार

तारीख - एकूण अंत्यसंस्कार - कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या

४ एप्रिल - ३४ - ४

५ एप्रिल - ३४ - ६

६ एप्रिल - २१ - ४

७ एप्रिल - ३४ - ४

८ एप्रिल - ३९ - ५