शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
3
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
4
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
5
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
6
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
7
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
8
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
9
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
10
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
11
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
12
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
13
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
14
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
15
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
16
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
17
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
18
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
19
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
20
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव

खान्देशात 20 जणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

By admin | Published: June 26, 2017 4:04 PM

काही ठिकाणी ‘महावितरण’च्या हलगर्जीपणाचे बळी

ऑनलाईन लोकमत/किशोर पाटील

जळगाव, दि.26 - पावसाळ्यात विजेमुळे होणा:या अपघातांचे वाढते प्रमाण चिंताजनक आह़े गेल्या 22 दिवसात खान्देशात वीजेचा धक्क्यामुळे 20 जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. त्यात एक बालक व दोन महिलांचा समावेश आहे.
पावसाळ्यात विजेचा प्रवाह जास्त असतो़ घरातील अर्थिग सुस्थितीत असल्यास त्यामुळे अपघाताचा धोका कमी असतो़ अर्थिग नसल्याने विजेचा धोरदार धक्का बसून जीव जाण्याची शक्यता असत़े यामुळे महावितरणच्या जनसंपर्क कार्यालयाकडून नागरिकांना अपघात टाळण्यासाठी दक्षता घेण्याबाबत तसेच प्रतिबंधक उपायोजनाबाबत माहिती देण्यात येते. मात्र त्याकडे नागरिक दुर्लक्ष करत असल्याने त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागत आह़े़ तर काही घटनांमध्ये वीजचोरीही जीवावर बेतत आह़े  
अपघाताची प्रमुख कारणे  
घरात पाण्याचे विद्युत मोटारीला स्पर्श,  कपडे वाळत घालण्यासाठी वीज खांबास वा विद्युत प्रवाहित होईल अशा ठिकाणी बांधलेली विद्युत संवाहक तार , घरातील लोखंडी खिडकी, दरवाजा, ग्रिल (जाळी) तसेच फ्रिज, कुलर, मिक्सर, इस्त्री, गिझर, पाण्याची मोटार आदी विद्युत उपकरणांमध्ये विद्युत प्रवाह उतरून स्पर्श झाल्याने, विद्युत खांब वा स्टे वायरला स्पर्श, शेतात ओल्या हाताने पंप सुरु करताना, शेतातील कृषी पंपात अर्थिगमध्ये वीजप्रवाह उतरल्याने स्पर्श होवून, वीजतारांवर आकडा टाकताना, ही अपघाताची प्रमुख व वारंवार दिसून येणारी कारणे आहेत. लोंबळणा:या तारांबाबत उपायायोजना केल्या जात नसल्याने त्यामुळे दुर्घटनांना सामोरे जावे लागत आह़े
दोन लाखांवरून आता चार लाख रूपये आर्थिक मदत 
विजेच्या धक्का लागून मृत्यू झालेल्या घटनाचा विद्युत निरिक्षकांमार्फत संबंधित प्रकरणाचा अहवाल तयार करण्यात येतो़ विद्युत निरिक्षकाच्या अहवालात जर महावितरण विभागाची चूक असल्याचे निदर्शनास आले, तर मयताच्या वारसास आर्थिक मदत करण्यात येत़े गेल्या वर्षार्पयत दोन लाख रूपये मदत दिली जात होती़ जानेवारी 2017 पासून मदतीत वाढ झाली आह़े आता मयताच्या वारसास चार लाख रूपयांर्पयत मदत देण्यात येत असल्याची माहिती महावितरण जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली़
 महावितरणच्या उदासीन कारभाराचे दोन बळी
 किशोर हरी बाविस्कर (30)आणि संदिप हिलाल बाविस्कर (28) दोन्ही रा. गोरगावले (चोपडा) या जळगाव तालुक्यातील भोलाणे (जळगाव) येथील शौच खडडयाचे काम करत होत़े यादरम्यान खोदकाम पूर्ण झाल्याची लोखंडी पाईपाच्या सहाय्याने खात्री करताना विद्युत तारांना पाईपाच्या स्पर्श झाल्याने किशोर बाविस्करला जोरदार वीजेचा धक्का बसून त्याचा जागीच मृत्यू झाला होता तर संदीप बाविस्कर हा जखमी झाला होता़ 
पाचोरा तालुक्यातील चुंचाळे येथे दुचाकीवरून घराकडे परतत असताना अंगावर वीजतारा कोसळल्याने उमेश रामकिसन झंवर (वय 47, रा़ बाळद ता़) यांचा मृत्यू झाला होता़ 
अनेक ठिकाणी जीर्ण तसेच लोंबकळणा:या तारा आहेत़ याबाबत महावितरणकडून आवश्यक उपाययोजना केल्या जात नसल्याने नागरिकांना जीव गमवावा लागत आह़े त्याकडे महावितरण लक्ष देणे गरजेचे आह़े
 
महावितरणकडून वेळावेळी दुरूस्तीची कामे केली जात असतात़ मात्र जोरदार वादळामुळे विद्युत खांब कोसळतात़,तारा तुटतात व दुर्देवी घटनांमध्ये विजेच्या धक्क्याने मृत्यू होतो़ नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
 - दत्तात्रय बनसोडे, अधीक्षक अभियंता़