शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जिल्ह्यातील ३ लाख २३ हजार कुटुंबांना मिळणार पोटभर जेवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात केशरी शिधापत्रिकाधारकांनादेखील सवलतीच्या दरात धान्य दिले जाणार आहे. त्याचा फायदा जिल्ह्यातील ३ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात केशरी शिधापत्रिकाधारकांनादेखील सवलतीच्या दरात धान्य दिले जाणार आहे. त्याचा फायदा जिल्ह्यातील ३ लाख २३ हजार कुटुंबांना होणार आहे. जून महिन्यात त्यांना दरमहा ८ रुपये किलो दराने गहू आणि १२ रुपये प्रति किलो दराने तांदूळ दिले जाणार आहेत. या योजनेत केशरी कार्डधारकांना प्रति माह प्रतिव्यक्ती तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ दिला जाणार आहे. शासकीय गोदामे आणि रास्त भाव दुकानांमध्ये शिल्लक असलेल्या धान्यातून सध्या हे वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य शासनाने बुधवारी याबाबतचे आदेश दिले आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतंर्गत आणि शेतकरी योजनेंतर्गत समाविष्ट न झालेल्या जिल्ह्यातील ३ लाख २३ हजार कुटुंबांना मे २०२० ते ऑगस्ट २०२० या कालावधीत सवलतीच्या दराने धान्य वितरण करण्यात आले होते. मात्र या कालावधीत धान्याची पुरेशी उचल झालेली नसल्याने हे अन्नधान्य जून २०२१ या कालावधीत गहू ८ रुपये आणि तांदूळ १२ रुपये प्रति किलो दराने देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

प्रथम मागणी करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने हे धान्य वितरित करण्यात यावे. वितरणाच्या आधी धान्याची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक रास्त भाव दुकानातील पाच लाभार्थ्यांच्या घरी जाऊन तपासणी करण्याचे आदेशदेखील देण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील एकूण रेशनकार्डधारक

बीपीएल - ४७,०९५०

अंत्योदय - १३,७७४९

केशरी - ३२,३०११

बीपीएलच्या ४ लाख ७० हजार कुटुंबांना लाभ

जिल्ह्यात या आधी सुरू असलेल्या मोफत अन्नधान्य योजनेचा लाभ जिल्ह्यातील चार लाख ७० हजार ९५० बीपीएल शिधापत्रिकाधारकांना मिळाला आहे. तसेच अंत्योदय योजनेतील १ लाख ३७ हजार ७४९ जणांना या मोफत धान्य योजनेचा लाभ मिळाला आहे.

केशरीच्या ३ लाख २३ हजार कुटुंबांना मिळणार लाभ

जून महिन्यात जिल्ह्यातील ३ लाख २३ हजार ११ कुटुंबांना या सवलतीच्या दरातील धान्य योजनेचा लाभ मिळणार आहे. मागील वर्षीदेखील अशा प्रकारे या योजनांचा लाभ केशरी कार्डधारकांना देण्यात आला होता. त्यांना सवलतीच्या दरात धान्य देण्यात आले होते. आतादेखील राज्य सरकारने शिल्लक राहिलेल्या धान्यातून सवलतीच्या दरात धान्य देण्याचे आदेश दिले आहेत.