शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

विजेची तार तुटून पडल्याने येथील ३२ शेळ्या ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 21:53 IST

बंदिस्त असलेल्या ३२ शेळ्यांवर मुख्य विजेची तार तुटून पडल्याने त्या पशुधनाचा तडफडून मृत्यू होऊन लाखोंचे नुकसान झाले.

ठळक मुद्देबांबरुड येथील घटना, शेतकरी संकटात

लोकमत न्यूज नेटवर्क

कुरंगी, ता. पाचोरा : येथून जवळच असलेल्या बाबरूड राणीचे येथील गाव शिवारातील एका भिल्ल समाजाचा ज्येष्ठ नागरिकाच्या बंदिस्त असलेल्या ३२ शेळ्यांवर मुख्य विजेची तार तुटून पडल्याने त्या पशुधनाचा तडफडून मृत्यू होऊन लाखोंचे नुकसान झाले.

घटनास्थळी महावितरण, पोलीस व पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित होते तर ‘महसूल’चे अधिकारी अनुपस्थित होते. दि. १२ एप्रिलला सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास बांबरुड राणीचे येथील राजाराम सखाराम भिल्ल (६८) यांच्या मालकीच्या १० बोकड, २२ शेळ्या अशा एकूण ३२ शेळ्या भूमिहिन असलेले राजाराम भिल हे संसाराचा गाडा हाकत होते. जुन्ने शिवारात व वनविभागाला लागून शेतावर बसवलेल्या असताना सोमवारी सकाळी सातच्या सुमारास मुख्य विजेची लाईनवरील क्लँम तुटल्यामुळे विजेचा तार खाली पडल्यामुळे शेतातील ३२ बकरी जागेवरच तडफडून मरण पावल्या.

मोठी घटना टळली

राजाराम भिल्ल हे ज्या ठिकाणी राहत होते, त्या ठिकाणी झोपडीत रात्री वन्यप्राण्यांच्या बचावासाठी त्या शेळ्यांना कोंडून ठेवत होते व दररोज सकाळी झोपडी शेजारी तारेचे वाॅल कंपाैंड केलेले होते, त्याठिकाणी त्या शेळ्यांना ठेवत होते. दररोजच्या नियमानुसार शेळ्या तार कंपाैंडमध्ये टाकल्यानंतर व राजाराम भिल्ल हे झोपडीतील साफसफाई करून सकाळचा चहा करत असतानाच मोठा किंचाळण्याचा आवाज आल्याने त्यांनी बाहेर बघितले तर ३२ शेळ्या यांच्या अंगावर विजेची तार पडून त्या तडफडत मृत्यू पावत होते तर तेथेच एका निंबाच्या झाडाखाली एक दुधाळ गाय, वासरू बाधलेले होते.

तुटलेली विजेची तार त्या निंबावर पडल्याने गाय, वासरू व राजाराम भिल्ल हे बालंबाल बचावले. घटनास्थळी ‘महावितरण’चे लासलगाव उपकेंद्राचे सहाय्यक अभियंता दीपक बानबाकूडे, लाईनमन अनिल मिस्तरी, वासुदेव पाटील, प्रेमचंद राठोड, अकिल मेवाती यांनी पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश बारी, युवराज चौधरी यांनी जागेवर मृत झालेल्या पशुधनाचे शवविच्छेदन केले.

पोलीस प्रशासनाचे सहाय्यक फौजदार रामदास चौधरी, चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. एवढी मोठी घटना घडली असताना महसूल विभागाची अनुपस्थिती दिसून आली. मृत झालेल्या शेळ्यांची आजच्या बाजारभावानुसार ४.५० लाखांचे नुकसान झाले असून ते त्वरित मिळावे, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :JalgaonजळगावPachoraपाचोराFarmerशेतकरी