शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
3
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
4
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
5
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
6
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल
7
"असा प्रत्येक कट महाराष्ट्रातील लोक उधळून लावतील", मोदींचा काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा
8
देशातील गरिबांना 2028 पर्यंत मोफत धान्य मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय
9
हरयाणातील निवडणुकीच्या निकालावर रॉबर्ट वाड्रांची प्रतिक्रिया, ईव्हीएम बॅटरीच्या मुद्द्यावर म्हणाले...
10
मनोज जरांगेंशी पंगा घेणाऱ्या अपक्ष आमदाराने भाजपाकडून निवडणूक लढण्याची केली घोषणा
11
"जितना हिंदू बंटेगा, उतना...", असं का बोलले पंतप्रधान मोदी? महाराष्ट्रातील जनतेला केलं मोठं आवाहन
12
'असरदार' सरदार! अर्शदीपची Top 10मध्ये एन्ट्री; हार्दिक पांड्याही दुसऱ्या यादीत Top 3 मध्ये!
13
 "महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार", 90 कोटींच्या कंत्राटावर जयंत पाटलांची संतप्त पोस्ट
14
हरयाणात 14 जागांवर काँग्रेसचा निसटचा पराभव; आम आदमी पक्षामुळे गमावल्या 5 जागा
15
हरयाणात निकालांनंतर भाजपाचं अर्धशतक पूर्ण, दोन अपक्ष आमदारांनी दिला पाठिंबा
16
Trent shares: TATA च्या 'या' शेअरनं रचला इतिहास, २ दिवसांपासून मोठी खरेदी; एक्सपर्ट बुलिश
17
फायद्याची बातमी! २०० रुपये वाचवून गुंतवणूक करा, मॅच्युरिटीवर २८ लाख मिळतील; LIC ची जबरदस्त योजना
18
गुणरत्न सदावर्तेंनी 'बिग बॉस'चे नियम बसवले धाब्यावर, आधी ढाराढूर झोपले आता घातला गोंधळ!
19
कर्मचाऱ्यांसाठी ESIC बाबत महत्त्वाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, अनेकांना मिळणार लाभ!
20
वाढदिवस ठरला शेवटचा! केक, पापड आणि...; ५ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूमागचं सत्य काय?

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडलेल्या कंटेनरमध्ये आढळले ३४ मृत जनावरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 4:13 AM

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्री फैजपूर येथील वाघोदा फाट्यावर गुरांची निर्दयीपणे वाहतूक करणारा कंटेनर अडविला. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्री फैजपूर येथील वाघोदा फाट्यावर गुरांची निर्दयीपणे वाहतूक करणारा कंटेनर अडविला. त्यातील ३४ जनावरांचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला. यात दोन गाय व ३२ गोर्हे यांचा समावेश होता. या सर्व जनावरांचे वय तीन ते आठ वर्षाच्या दरम्यान होते. या मृत जनावरांना जळगावातील कुसुंबा गोशाळेच्या परिसरात दफन करण्यात आले.

दरम्यान, जनावरे भरून आलेला कंटेनर मध्यप्रदेशातून आल्याचे सांगण्यात येत आहे. वाघोदा फाट्यावर कंटेनर आल्यानंतर फैजपूर पोलिसांच्या मदतीने हा कंटेनर जसाचा तसा कुसुंबा गोशाळेत आणण्यात आला. पहाटे तीन वाजता हा कंटेनर पोहोचला. तेथे उघडून पाहिले असता सर्व जनावरे मृत झालेले होते. सर्वांचे पोट फुगले होते कंटेनरमधून प्रचंड दुर्गंधी बाहेर येत होती. जनावरांची स्थिती पाहिल्यानंतर किमान तीन दिवसापूर्वी त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज गोशाळेतील कर्मचाऱ्यांनी वर्तविला दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव शहरातील बजरंग दलाचे मोहन तिवारी, राकेश लोहार, जितू पाटील, गणेश बच्छाव, आकाश पाटील व मुकेश पाटील यांनी कुसुंबा गोशाळेत धाव घेतली.

पाच एकर जागेत केले दफन

कुसुंबा गोशाळा लागुनच संस्थेची पाच एकर जागा आहे. या ठिकाणी मृत झालेल्या जनावरांना दफन केले जाते. गुरुवारी सकाळी जेसीबीच्या माध्यमातून खोल खड्डे करून ही जनावरे त्यात दफन करण्यात आली. गोशाळेचे वाल्मिक पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी यासाठी मेहनत घेतली. सकाळी सात वाजे पासून सुरू झालेले हे काम दुपारी दोन वाजता संपले.