शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआच्या जागावाटपात संजय राऊतांसोबत वाद?; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं
2
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला अपहरण करून बेदम मारलं; धारदार शस्त्राने बोटे छाटले, वाद काय?
3
ज्योत आणायला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी
4
इस्रायल-इराण युद्ध एकतर्फी होणार नाही; जाणून घ्या कुणाची लष्करी ताकद किती?
5
पुणे हेलिकॉप्टर अपघातील मृतांबाबत महत्त्वाची समोर; भारतासाठी दिलं होतं मोठं योगदान
6
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
7
भारतीय गाढ झोपेत असताना दिसले 'रिंग ऑफ फायर', वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे अमेरिकेतून फोटो आले...
8
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
9
Share Market News : गुंतवणूकदारांना शेअर बाजार पावला, या वर्षी कमावले ११०.५७ लाख कोटी; जाणून घ्या
10
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका समर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
12
उपचारासाठी आले अन् कॅबिनमध्ये केली डॉक्टरची हत्या; पोलिसांकडून दोघांचा शोध सुरु
13
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
14
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
15
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
16
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
17
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
18
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
19
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
20
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक

३५ हजार मुलांना जावे लागणार बँकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 4:11 AM

लोकमत न्यूज नेटवर्क अमळनेर : सुट्टी कालावधीतील पोषण आहार वितरणाऐवजी त्या विद्यार्थ्यांच्या नावे बँकेत रक्कम जमा करण्याचा विचार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : सुट्टी कालावधीतील पोषण आहार वितरणाऐवजी त्या विद्यार्थ्यांच्या नावे बँकेत रक्कम जमा करण्याचा विचार शासनाने केला आहे. कोविड १९च्या तिसऱ्या लाटेच्या भीतीने शाळा बंद असल्या, तरी शासनाच्याच आदेशामुळे तालुक्यातील ३५ हजार १९३ विद्यार्थ्यांना बँकेत खाते उघडण्यासाठी जावे लागणार आहे.

विद्यार्थ्यांच्या बाबतीत असे गोंधळणारे आदेश काढण्यात येत असल्याने शिक्षकांसह पालक मुलांच्या संसर्गाच्या भीतीने चिंतेत पडले आहेत.

तिसऱ्या लाटेची भीती आणि त्यातल्या त्यात लहान मुलांना अधिक धोका असल्याने शासनाने किमान १५ ऑगस्टपर्यंत शाळा न उघडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, गेल्या शैक्षणिक वर्षातील उन्हाळी सुट्टी कालावधीतील शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आलेला नाही. त्याऐवजी विद्यार्थ्याच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्याचा शासन विचार करीत असून, राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी २५ जून रोजी आदेश काढून सर्व शालेय पोषण आहारास पात्र लाभार्थ्यांचे १०० टक्के बँक खाते उघडून, त्याची माहिती ९ जुलैपर्यंत जिल्हास्तरावर जतन करून ठेवण्याचे आदेशात म्हटले आहे.

फक्त अमळनेर तालुक्याचा विचार केल्यास तालुक्यात पहिली ते आठवीपर्यंत पोषण आहारासाठी पात्र ३५ हजार १९३ विद्यार्थी आहेत. १ ली - अद्याप प्रवेश नाही

१ ली- ४,०१७ २ री - ४,१९० ३ री- ४,४२७ ४ थी- ४,५६४ ५ वी- ४,६७८ ६ वी- ४,५२५ ७ वी- ४,४३९ ८ वी- ४,३५३

अशी विद्यार्थी संख्या आहे

सध्या डेल्टा प्लस, तसेच कोरोनाच्या भीतीने बँकांमध्ये ५० टक्के कर्मचारी क्षमतेने काम सुरू आहे. त्यामुळे बँक कर्मचारी नवीन खाते उघडण्यास टाळाटाळ करतात. फक्त शिष्यवृत्ती घेणाऱ्या मागासवर्गीय मुलांची किंवा त्यांच्या पालकांच्या नावाची खाती उघडली आहेत. मात्र, या आदेशात मुलांचीच खाती उघडायची असल्याने अडचणी जास्त आहेत. त्यातल्या त्यात विद्यार्थ्यांची खाती विना डिपॉझिट काढावी लागतात. त्यामुळे त्यांचा नकार मिळतो. त्याचप्रमाणे, खाते क्रमांक किमान ८ ते १० दिवस मिळत नाही. शेतीचे दिवस, पालक कामात व्यस्त असल्याने खाती उघडणे अवघड बाब आहे. शासनाने विद्यार्थ्यांनुसार रक्कम शाळेला देऊन ती जबाबदारी शाळेवर दिल्यास सोयीनुसार वाटप करता येणार आहे.

----

मुलांच्या नावाने खाते उघडायचे, म्हणजे मुलांना बँकेत न्यावे लागेल, त्यामुळे संसर्गाचा धोका आहेच, शासन असे विचित्र निर्णय कसे घेते, त्यापेक्षा शाळा सुरू कराव्यात. - अनिल पाटील, पालक, मंगरुळ

----

सुट्टी कालावधीतील शालेय पोषण आहार साधारणतः दीड महिन्याचा असेल, म्हणजे १ ली ते ५ वीपर्यंत १७९ रुपयांचा तर ६ वी ते ८ वीपर्यंत २६८ रुपयांचा पोषण आहार मिळेल. मात्र, खाती उघडण्यास किमान १०० रुपये लागतील, तर पालकांना परवडेल कसे?

- प्रकाश पाटील, तालुकाध्यक्ष मुख्याध्यापक संघटना, अमळनेर

----

शिक्षक १०वीच्या निकालात व्यस्त आहे, खाती उघडण्याची जबाबदारी वर्गशिक्षकवर आल्याने, अनेकदा गरीब मजुरांच्या मुलांना बँकेत घेऊन जाण्याची जबाबदारी शिक्षकावर येते संसर्ग झाल्यास जबाबदार कोण?

- आर.जे. पाटील, जिल्हा कार्यध्यक्ष, शिक्षक भारती संघटना ----

जळगाव

शासनाच्या किंवा वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करणे गरजेचे आहे, योग्य ती काळजी घेऊन प्रक्रिया मुदतीत पूर्ण करावी.

- आर.डी. महाजन, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती अमळनेर