शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

दोन दिवसात ४३ थकबाकीदारांचे नळ कनेक्शन कापले; मनपाची कारवाई  

By सुनील पाटील | Updated: February 27, 2024 19:31 IST

थकबाकीदारांसाठी लागू केलेली अभय योजना आता फक्त दोनच दिवस लागू राहणार आहे.

जळगाव: मालमत्ता कराचा भरणा न करणाऱ्या ४३ जणांचे नळ कनेक्शन महापालिकेने कापले असून १ मार्चनंतर ही मोहीत अजून तीव्र केली जाणार आहे. दरम्यान, थकबाकीदारांसाठी लागू केलेली अभय योजना आता फक्त दोनच दिवस लागू राहणार आहे. शनिवार व रविवारी सुटीच्या दिवशीही वसुलीचे कामकाज सुरु ठेवण्यात आले होते. या दोन दिवसात अभय योजनेअंतर्गत २१ लाख ७९ हजार ४९३ रुपयांचा भरणा थकबाकीदारांनी केलेला आहे.

महापालिकेच्या वतीने थकबाकीदारांसाठी ८ फेब्रुवारीपासून अभय शास्ती योजना लागू करण्यात आली आहे. २९ फेब्रुवारीपर्यंत ही योजना लागू आहे. २६ फेब्रुवारी अखेर ६ कोटी ४५ लाख ५१ हजार १७१ रुपयांचा भरणा झाला आहे. ज्या मिळकत धारकांकडे थकबाकी कराचा भरणा बाकी आहे, अशांना मनपाकडून जप्तीचे अधिपत्र बजावणी झाल्यावर सुद्धा थकबाकी कराचा भरणा केलेला नाही अशा ४३ थकबाकी मिळकत धारकांचे नळ कनेक्शन कापण्यात आले आहे. चारही प्रभाग समित्यांमध्ये सोमवारी २८ तर मंगळवारी १५ अशा ४३ थकबाकीदारांचे कनेक्शन कापण्यात आले. २६ फेब्रुवारी रोजी १ कोटी ३४ लाख तर २७ रोजी १ कोटी ५ लाख असा एकूण २ कोटी ३९ लाखा लाखाचा भरणा झाला. मालमत्ता करावरील शास्ती माफीच्या योजनेस आता मुदतवाढ दिली जाणार नाही आहे असे मनपातर्फे कळविण्यात आले आहे.

योजनेचा कालावधी संपल्यानंतर थकबाकीदारांची नावे वर्तमानपत्रातून प्रसिद्ध केली जाणार असून त्यानंतर मनपा अधिनियम अंतर्गत जप्तीची पुढील कारवाई करण्यात येणार आहे. जप्तीची कारवाई टाळण्यासाठी थकबाकी कराचा भरणा करावा असे आवाहन मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड, उपाययुक्त (महसूल ) निर्मला गायकवाड (पेखळे ), सहाय्यक आयुक्त (महसूल) गणेश चाटे यांनी केले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव