शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

स्वेच्छानिवृत्तीसाठी ५० कर्मचाऱ्यांनी भरले अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2021 4:12 AM

जळगाव : राज्य परिवहन महामंडळाने वयाची ५० वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी `स्वेच्छानिवृत्ती`ची योजना आणली असून, या योजनेसाठी महामंडळाच्या जळगाव ...

जळगाव : राज्य परिवहन महामंडळाने वयाची ५० वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी `स्वेच्छानिवृत्ती`ची योजना आणली असून, या योजनेसाठी महामंडळाच्या जळगाव विभागातून ५० कर्मचाऱ्यांनी अर्ज केले आहेत. कर्मचाऱ्यांचे हे अर्ज जळगाव विभागातर्फे महामंडळाच्या मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयाकडे पाठविण्यात आले असल्याची माहिती महामंडळ प्रशासनातर्फे देण्यात आली.

राज्य परिवहन महामंडळाने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यापासून वयाची ५० वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार सध्या ५० वय ओलांडलेल्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती घेताना मूळ वेतन व महागाई भत्ता दिला जाणार आहे. तसेच प्रत्येक वर्षासाठी १२ ऐवजी तीन महिन्यांचे वेतन दिले जाणार असून, नियमानुसार स्वेच्छानिवृत्तीचे लाभही देण्यात येणार आहेत. तसेच या कर्मचाऱ्यांना मोफत कौटुंबिक पासची योजनाही लागू राहणार आहे. या सर्व अटी-शर्ती ज्या कर्मचाऱ्यांना मंजूर आहेत, अशा कर्मचाऱ्यांकडून महामंडळातर्फे स्वेच्छानिवृत्तीचे संमतीपत्र भरून घेण्यात आले आहे. त्यानुसार जळगाव आगारातील आतापर्यंत ५० कर्मचाऱ्यांनी हे संमतीपत्र भरून, स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केले आहेत. दरम्यान, सध्या महामंडळात विविध विभागांमध्ये ५० वर्षांवरील दीड हजारांहून अधिक कर्मचारी असताना, बोटावर मोजण्याइतक्याच कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीचे अर्ज भरल्यामुळे या योजनेकडे कर्मचाऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.

इन्फो :

ज्या कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केले होते, त्या कर्मचाऱ्यांचे अर्ज महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. तर मध्यवर्ती कार्यालयाकडूनही मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. मात्र, त्यावर अद्याप शासनाकडून कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही.

- प्रशांत महाजन, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी, एसटी महामंडळ