शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

जिल्ह्यात ९९५ मृत्यूंचे झाले ऑडिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 4:13 AM

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत अडीच हजारापेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला असला आहे. त्यातील ९९५ जणांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत अडीच हजारापेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला असला आहे. त्यातील ९९५ जणांच्या मृत्यूचे जिल्हा प्रशासनाने प्रशासकीय ऑडिट आणि डेथ ऑडिट केले आहे. त्यात रुग्ण कोरोनाच्या संसर्गानंतर कितव्या दिवशी दाखल झाला, त्यावर कोणते उपचार करण्यात आले यासह विविध कारणांचा शोध घेण्यात येतो आणि नंतर ती कारणे दूर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी दिली.

गेल्या मार्च महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर एप्रिलमध्ये कोरोनाने पहिला बळी घेतला. त्यानंतर आतापर्यंत दोन हजार ५०० पेक्षा जास्त जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यात जिल्हा आरोग्य यंत्रणेने आतापर्यंत ९९५ जणांच्या मृत्यूचे ऑडिट केले आहे. याबाबत डॉ. चव्हाण यांनी सांगितले की, ‘यात संबंधित व्यक्ती रुग्णालयात कधी दाखल झाली होती, त्यानंतर त्यांच्यावर कोणते उपचार करण्यात आले, त्यांची लक्षणे काय होती किंवा उपचार आधी मिळाले असते तर त्याचा कसा फायदा झाला असता, यांचा ऊहापोह करण्यात येतो, असेही त्यांनी सांगितले.

बहुतेक वेळा खासगी डॉक्टर कोरोनाची लक्षणे असतांनाही रुग्णांवर इतर आजारांचे उपचार करतात. त्याची देखील माहिती या अहवालात घेतली जाते. अशाच एका अहवालानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्ह्यातील १३ डॉक्टरांना नोटीस बजावली होती.