शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

विमानतळावरील दोन तासांच्या पडताळणीनंतर २५ शववाहिकेतून मृतदेह रवाना

By विलास बारी | Published: August 24, 2024 10:50 PM

नेपाळातील अपघात प्रकरण : जळगावात दाखल झाले रात्री सव्वासात वाजता विमान

जळगाव : नेपाळमधील गण्डकी प्रांतातील तनहुँ जिल्ह्यातील मार्स्यांगडी नदीत भाविकांची बस कोसळल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या घटनेतील मृतांचे मृतदेह विशेष विमानाने रात्री सव्वासात वाजेच्या सुमारास जळगावात दाखल झाले. तब्बल दोन तासांच्या तपासणीनंतर २५ शववाहिकांमधून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी वरणगावसह सुसरी, पिंपळगाव खुर्द, गोळेगाव, तळवेल, आचेगाव या गावांकडे रवाना झाले.

भाविकांच्या बसला झालेल्या अपघातानंतर मृतांचे मृतदेह जळगावात आणण्यासाठी शनिवारी दिवसभर हालचाली सुरू होत्या. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यालयाशी संपर्क केला. आंतरराष्ट्रीय सेवेचे विमान जळगावात उतरवता येणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, काठमांडूत भारतीय संरक्षण खात्याचे विमान उतरविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट संपर्क साधला. त्यानुसार काठमांडूहून मृतदेह घेऊन निघणाऱ्या गृह मंत्रालयाच्या विमानाला जळगावात उतरविण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला.

अमित शाह यांनी तातडीने त्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानंतर काठमांडूहून संरक्षण दलाचे विशेष विमान थेट मृतदेहांना घेऊन रात्री सव्वासात वाजता जळगाव विमानतळावर दाखल झाले. यादरम्यान चौकशी व पळताळणी करून तब्बल दोन तासांनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी विमानतळावर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आमदार संजय सावकारे, विभागीय आयुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.