शहरं
Join us  
Trending Stories
1
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
3
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
4
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
5
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
6
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
7
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
8
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
9
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
10
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
11
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
12
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
13
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
14
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
15
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते
16
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
17
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
18
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
19
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
20
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा

अंबरझरा पाटचारी कचरा आणि गाळाने भरली तुडूंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 4:13 AM

फोटो नंबर २८ सीटीआर २७ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मेहरुण तलावाचा मुख्य जलस्त्रोत असलेल्या अंबरझरा तलावाच्या पाटचारीत मोठ्या ...

फोटो नंबर २८ सीटीआर २७

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मेहरुण तलावाचा मुख्य जलस्त्रोत असलेल्या अंबरझरा तलावाच्या पाटचारीत मोठ्या प्रमाणावर कचरा आणि गाळ साचल्याने ही पाटचारी तुडूंब भरली आहे. त्यामुळे तलावाकडे येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहावर परिणाम होणार आहे. मनपा प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी या पाटचारीची स्वच्छता करण्याची मागणी पर्यावरण प्रेमी व नागरिकांकडून केली जात आहे.

जळगाव शहराचे वैभव असलेल्या मेहरूण तलावाचा अंबरझरा येथील मुख्य जलस्त्रोत आहे. मेहरूण तलावाचा हा एकच मुख्य जलस्त्रोत आहे. हा तलाव भरल्यानंतर पाटचारीद्वारे हे पाणी अंबरझरा तलावात येते. गेल्या वर्षी या पाटचारीची मराठी प्रतिष्ठान मार्फत सफाई संपूर्ण गाळ काढण्यात आला होता. तसेच पाटचारी खोलही करण्यात आली होती. मात्र, या पाटचारीला लागून नागरी वस्ती असल्याने मोठ्या प्रमाणावर कचरा या पाटचारीत जमा होतो. गेल्या वर्षी या पाटचारीची सफाई केल्यानंतर, आता पुन्हा या ठिकाणी कचरा व गाळ साचला आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी तातडीने पाटचारीची स्वच्छता करण्याची मागणी मराठी प्रतिष्ठानच्या वतीने महापौरांकडे करण्यात आली आहे, अशी माहिती विजय वाणी यांनी दिली.

इन्फो :

तर तलाव अपूर्ण भरणार

मेहरुण तलावात अंबरझरा तलावाच्या पाटचारीद्वारेच पाणी येते. सध्या हा एकच तलावाचा मुख्य जलस्त्रोत आहे. जर पाटचारीची पावसाळ्या पूर्वी स्वच्छता केली नाही, तर तलावाकडे येणारा पाण्याचा स्रोत मंदावेल. त्यामुळे तलाव पूर्ण भरणार नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाने तातडीने ही पाटचारीची स्वच्छता करण्याची मागणी करण्यात येत आहे.