शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

‘त्या’ वाढीव १६५ कॉलन्यांमधील ‘अमृत’च्या कामाला मंजुरीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2021 4:12 AM

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात गेल्या तीन वर्षांपासून अमृतअंतर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम जवळपास ९० टक्के ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात गेल्या तीन वर्षांपासून अमृतअंतर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम जवळपास ९० टक्के पूर्ण झाले आहे. मात्र, मनपा प्रशासनाच्या चुकांमुळे शहरातील वाढीव भागातील १६५ कॉलन्यांचा या योजनेत समावेश करण्यात आला नव्हता, या योजनेचे काम पूर्ण होत आल्यावर वाढीव भागातील नळ कनेक्शनचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर गेल्या सहा महिन्यांपूर्वी मनपा प्रशासनाने यावर डीपीआर तयार केला होता. हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असून शासनाची मंजुरी मिळाली नसल्याने हे काम रखडले आहे.

अमृतअंतर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण होत आले आहे. मात्र, शहरातील वाढीव भागात अद्यापही या कामाला सुरुवात झालेली नाही. वाढीव भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या कायम असून, या वाढीव भागात देखील अमृतचे पाणी मिळावे यासाठी नगरसेवक व लोकप्रतिनिधींनी मनपाच्या महासभेत सातत्याने प्रश्न उपस्थित करून, १६५ कॉलन्यांमध्येही अमृतचे पाणी मिळावे यासाठी नव्याने डीपीआर तयार करून, महासभेची मंजुरी मिळवून, हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

वाढीव निधीची पडणार नाही गरज

वाढीव भागातील कामासाठी तयार करण्यात आलेल्या डीपीआरअंतर्गत मनपाने ३० कोटी रुपयांची तरतूद केली होती. मात्र, अमृत योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामात काही निधी शिल्लक राहणार असल्याने शिल्लक निधीतूनच हे काम मार्गी लावण्यात येणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच या कामासाठी स्वतंत्र निविदा प्रक्रिया न राबविता सद्यस्थितीत काम करत असलेल्या जैन इरिगेशन या कंपनीलाच हे काम देण्यात येणार असल्याचीही माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

तांत्रिक अडचणींची करण्यात आली दुरुस्ती

मनपाकडून वाढीव भागातील कामांसाठी नव्याने डीपीआर तयार करून, शासनाकडे पाठविण्यात आल्यानंतर शासनाने या प्रस्तावात काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. या अडचणी दुरुस्त केल्यानंतर पुन्हा हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असून, आता लवकरच शासनाकडून मंजुरी मिळेल आणि कामाला सुरुवात केली जाईल, अशी माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे.