ऑनलाईन लोकमतअमळनेर, जि. जळगाव, दि. 15 - : बैलगाडीवरुन पडून पाच वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची सुमारास गलवाडे ते झाडी दरम्यान घडली.साक्री तालुक्यातील वाघापूर धनगरांचा तांडा उदरनिर्वाहासाठी अमळनेरकडे आला होता. पावसाळा सुरु झाल्याने तांडा आपल्या गावाकडे परत निघाला होता. पाच ते सहा गाडय़ांवर सर्व सामान व त्यांचे परिवार गर्दी करुन बसलेले होते. गलवाडय़ाच्या पुढे सोनाबाई खंडू धनगर ही पाच वर्षाची मुलगी गाडय़ाखाली रस्त्यावर पडून तिला डोक्याला गंभीर मार लागल्याने मयत झाली.
अमळनेर येथे बैलगाडीवरुन पडून बालिकेचा मृत्यू
By admin | Published: June 15, 2017 1:13 PM