शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

बेलगंगेचे बॉयलर उद्या पेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 1:16 AM

गेल्या दहा वर्षापासून बंद पडलेला चाळीसगाव तालुक्यातील बेलगंगा साखर कारखान्याचे बॉयलर सोमवार १२ रोजी पेटणार आहे.

ठळक मुद्देकाही महिन्यांपासून कारखान्यातील यंत्रणेच्या दुरूस्तीचे सुरू होते कामगिरणा परिसरात मुबलक ऊस उपलब्ध, तिनशे कामगारही सज्ज

चाळीसगाव : गेल्या दहा वर्षापासून बंद असलेल्या बेलगंगा साखर कारखान्याचे बॉयलर सोमवारी पेटणार असून परिसरात समाधानाचे वातावरण पसरले आहे. गेल्या सहा महिन्यापासून कारखान्याचे यंत्र दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु होते. सोमवारी सकाळी ११ वाजता बॉयलर अग्नि प्रदिपन सोहळा होत असल्याची माहिती चेअरमन चित्रसेन पाटील यांनी दिली.बेलगंगा साखर कारखान्याला जिल्हा बँकेने दहा वर्षापूर्वी मालकी म्हणून टाळे लावले होते. मात्र चित्रसेन पाटील यांनी लोकसहभागातून ४० कोटी रुपये उभे करुन कारखाना विकत घेऊन भूमिपुत्रांची मालकी प्रस्थापित केली. यामुळेच चाळीसगाव तालुक्यात गेल्या सहा महिन्यापासून बेलगंगेच्या चिमणीतून धूर निघण्याची प्रतिक्षा केली जात होती.गेल्या काही महिन्यांपासून कारखान्यात रोलसह, बॉयलर व विजपुरवठा विभागाचे कामकाज केले जात होते. हे काम युद्धपातळीवर सुरु असल्याने ते पुर्ण झाले. कारखान्याने सहा कोटी रुपये ऊसतोड मजुरांना अदा करुन करारही केला आहे. गिरणा परिसरात गाळपासाठी लागणारा ऊसही उपलब्ध असल्याने दरदिवशी २५०० मेट्रीक टन ऊसाचे गाळप केले जाणार आहे.तीनशे कामगारही असून ऊस उत्पादकांना परजिल्ह्यात ऊस विकण्याच्या त्रासातून देखील सुटका होणार आहे. कारखाना नावावर लागण्याच्या प्रक्रियेत हरकतींच्या सुनावणीमुळे वेळ गेला. त्यामुळेच बॉयलर पेटण्यास एक महिना उशीरच झाला असून लवकरच गव्हाणीत ऊस मोळी टाकण्याचा सोहळा होऊन प्रत्यक्ष गाळपाला सुरुवात केली जाणार असल्याचेही चेअरमन पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने