शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रात आचारसंहिता?; निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता
2
आता लाडक्या बहिणींच्या खात्यात केव्हा जमा होणार ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे? फडणवीस म्हणाले- काळजी करू नका, परत...
3
Mumbai Metro 3 Ticket Rates: मेट्रो-३ चे तिकीटाचे दर काय? कुठून कुठवर सेवा? कसा होणार फायदा? जाणून घ्या सारंकाही...
4
"सावरकर गोमांस खायचे, त्यांनी कधीही..."; कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांचं वादग्रस्त विधान
5
Bigg Boss Marathi 5 : रितेश देशमुखचे 'भाऊच्या धक्क्या'वर कमबॅक, ग्रँड फिनाले रंगणार ६ ऑक्टोबरला
6
Navratri Special: नीना कुळकर्णींची लेक सोहादेखील आहे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत, अभिनयात नाही पण...
7
सद्गुरूंच्या ईशा फाऊंडेशनला मोठा दिलासा, उच्च न्यायालयाच्या आदेशाला SC ची स्थगिती; नेमकं प्रकरण काय?
8
सावधान! जास्त टोमॅटो खाल्ल्याने वाढते सांधेदुखी, चालणं होतं अवघड; 'या' समस्यांचा धोका
9
मारुतीची गाडी घेतली असेल तर सतर्क रहा; हा सोन्याएवढा मौल्यवान पार्ट चोरांच्या रडारवर
10
नवरात्र: अखंड दिवा अत्यंत शुभ, ‘या’ दिशेला लावा, अकाल मृत्यू टाळा; वाचा, अखंड ज्योत महत्त्व
11
मर्डर मिस्ट्री! विम्याचे पैसे हडपण्यासाठी बायकोचा काढला काटा; 'असा' रचला भयंकर कट
12
Navratri 2024: प्रतापगडावर दोन घट बसविण्याची परंपरा असलेले राज्यातील एकमेव मंदिर!
13
महायुतीचा प्लॅन! पुन्हा सत्तेत येण्याची रणनीती; जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, आता...
14
पुराने उद्ध्वस्त केलं, लेकीच्या लग्नासाठी जमवलेलं सर्व सामान वाहून गेलं; डोळे पाणावणारी घटना
15
"शेतकऱ्यांच्या मुलांची परिस्थिती बिकट, हेच त्यांनी..."; अजितदादांच्या आमदाराने देवेंद्र भुयारांची घेतली बाजू
16
Navratri 2024: नैवेद्यात ठेवा रोजचेच स्वयंपाक घरातले 'हे' जिन्नस, तरीही होईल देवीची कृपा!
17
माटुंग्यातल्या व्यापाऱ्याने अटल सेतूवरुन मारली उडी; पोलिसांना सापडला मृतदेह
18
वोटिंगनुसार 'हाच' विजेता, पण गेमनुसार... Bigg Boss Marathi 5 बद्दल शिव ठाकरेचा खुलासा
19
Navratri 2024: नवरात्रीत देवी भागवत पारायण केल्याने मिळते शेकडो पटीने पुण्य!
20
नवरात्र: तुमची रास कोणती? विशेष पूजा अन् नवदुर्गांना ‘हा’ नैवेद्य अर्पण करा; भरभराट होईल

कोरोनामुक्त गावातील शाळांची घंटा खणखणणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 4:19 AM

जळगाव : कोरोनाच्या संक्रमणामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा ऑनलाइन पद्धतीनेच सुरू आहेत. मागील वर्षी दिवाळीनंतर शालेय शिक्षण विभागाने शाळा प्रत्यक्ष ...

जळगाव : कोरोनाच्या संक्रमणामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा ऑनलाइन पद्धतीनेच सुरू आहेत. मागील वर्षी दिवाळीनंतर शालेय शिक्षण विभागाने शाळा प्रत्यक्ष सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या. पण आता कोरोना संसर्गाची स्थिती पाहता, अनेक ठिकाणी लाट निवळत असल्याने कोरोनामुक्त गावातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू करण्यास राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. तसे परिपत्रक सरकारने सोमवारी जाहीर केले आहे.

राज्यातील कोरोनामुक्त गावांमधील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास राज्य सरकारने सशर्त मान्यता दिली आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी तेथील ग्रामपंचायत वा स्थानिक स्वराज्य संस्थांनी तसा ठराव मंजूर करावयाचा आहे. हा ठराव पालकांशी चर्चा करून नंतरच करायचा आहे. शिवाय सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करणे अनिवार्य आहे, असे शासनाच्या पत्रकात म्हटले आहे. जळगाव जिल्ह्यात १ हजार १७९ गावे ही कोरोनामुक्त आहेत. दरम्यान, आता जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

शाळांना हे नियम असतील बंधनकारक

- एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये ६ फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५-२० विद्यार्थी असावेत.

- विद्यार्थ्यांनी सतत हात धुवावेत, मास्कचा वापर करावा. कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवावे आणि त्वरित कोरोना चाचणी करून घ्यावी, आदी बाबींचे शाळांनी काटेकोर पालन करायचे आहे.

- शाळा सुरू करताना टप्प्याटप्प्याने मुलांना शाळेत बोलावण्यात यावे. विविध सत्रांत वर्ग भरवावेत.

- शाळा सुरू करण्यापूर्वी किंवा शाळा सुरू झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छताविषक काळजी घ्यावी.

- पालकांनी आजारी किंवा लक्षण असलेल्या मुलांना शाळेत पाठवू नये.

- संबंधित शाळेतील शिक्षकाची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात करण्यात यावी किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करू नये.

- विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णत: पालकांच्या संमतीवर अवलंबून असेल.

- शाळेचा परिसर दररोज नियमित स्वच्छ केला जावा.

- वर्गखोल्या, नेहमी स्पर्श होणारे जिने, स्वच्छतागृहे आदी भाग यांचे वारंवार निर्जंतुकीकरण करण्यात यावे.

शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांवर शारीरिक, मानसिक दुष्परिणाम

शाळा बंद आणि मुले घरी राहण्याने मुलांवर विविध प्रकारचे दुष्परिणाम होत असल्याचे शालेय शिक्षण विभागाने या परिपत्रकात नमूद केले आहे. शाळा बंद असल्यामुळे मुले एक वर्षापासून घरी बसली आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर शारीरिक, मानसिक दुष्परिणाम होत आहेत. शिवाय त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यांचे सोशलायझेशन होत नसल्याने त्यांच्या सामाजिक कौशल्यांचे नुकसान होत आहे. इंटरनेट, मोबाइलचा गैरवापर, गेम्सचे व्यसन, मानसिक तणाव, बालविवाह, बालमजुरीचे वाढते प्रमाण, मुलींचे ड्रॉप आऊट अशा विविध प्रकारे मुलांचे नुकसान होत असल्याने त्यांना नियमित शिक्षण मिळावे म्हणून कोविडमुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, असे या पत्रकात म्हटले आहे.

शिक्षकांना करावी लागणार चाचणी

संबंधित शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी करावी लागणार आहे. तसेच शाळेच्या दर्शनी भागावर फिजिकल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर आदी संदर्भात मार्गदर्शक सूचना प्रदर्शित करण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहेत.

शाळेच्या कार्यक्रमांवर निर्बंध

परिपाठ, स्नेह संमेलन, क्रीडा व इतर तत्सम कार्यक्रम, ज्यामुळे अधिक गर्दी होऊ शकते अशा कार्यक्रमांच्या आयोजनांवर कडक निर्बंध असणार आहे. संसर्ग टाळण्यासाठी पालकांनीदेखील शक्यतो स्वत:च्या वैयक्तिक वाहनाने पाल्यास शाळेत सोडण्याचेही पत्रात म्हटले आहे.

जळगाव जिल्ह्यात १ हजार १७९ गावे कोरोनामुक्त

जळगाव जिल्ह्यातील १ हजार १७९ गावे ही कोरोनामुक्त झाली आहेत. ७० गावांमध्ये तर एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही. दरम्यान, आता जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे़ तसेच शाळा सुरू व्हाव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांकडूनसुद्धा होत आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळांनीदेखील विशेष काळजी घ्यावी, असेही पालकांचे म्हणणे आहे.