शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

वजन कमी करण्याचे प्रॉडक्ट घेतले अन् जाळ्यात फसले; फ्रेंचाइजीच्या नावाने उद्योजकाला ४० लाखात गंडविले

By सुनील पाटील | Updated: February 21, 2025 17:54 IST

पोलिसात दाखल फिर्यादीनुसार, अशोक बियाणी हे मुलगा निकुंज व सून अमृता बियाणी असे गणपती नगरातील सुमन रेसीडेन्सी येथे वास्तव्यास आहेत.

जळगाव : वजन कमी करण्याचे प्रॉडक्ट घेतले अन‌् तिथेच उद्योजकाला जाळ्यात अडकवून फ्रेंचाइजीच्या नावाने ३९  लाख ५० हजार रुपयात गंडविण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. अशोक गिरधर बियाणी (वय ६८, रा.गणपती नगर, जळगाव) असे पीडित उद्योजकाचे नाव आहे. दिपेश कमलेश रुपानी (रा.श्रीराम कॉलनी, जळगाव) व आकाश सुरजमल सिध्दू उर्फ आकाश वर्मा (रा.अमरावती) या दोघांविरुध्द गुरुवारी रात्री रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसात दाखल फिर्यादीनुसार, अशोक बियाणी हे मुलगा निकुंज व सून अमृता बियाणी असे गणपती नगरातील सुमन रेसीडेन्सी येथे वास्तव्यास आहेत. त्यांची उमाळा येथे पॅकींग पुठ्ठा,खोके तयार करण्याची कंपनी असून बाप-लेक कामकाज पाहतात. कोरोना काळात मुलगा निकुंज बियाणी याची दिपेश कमलेश रुपानी याच्यासोबत ओळख झाली. दिपेश याने निकुंज याला हर्बोलाईफचे वजन कमी करण्याचे उत्पादन विकत दिले होते. या उत्पादनाचा काही दिवसांत निकुंज यांना फरक जाणवला.त्यातून दोघांच्या भेटी, गाठी व संबंध वाढले. अशातच दिपेशने निकुंज याला हर्बोलाईफच्या प्रॉडक्टची फ्रेंचाइजी घेण्याचा सल्ला देत गुंतवणुक करण्यास सांगितले. त्यानुसार रुपानी व कंपनीचे व्यवस्थापक आकाश वर्मा नावाचा व्यक्ती अशा देाघांनी कंपनीची योजना सांगून २२ लाख रुपये गुंतवायला सांगितले.कंपनीचे जास्तीत जास्त प्रॉडक्ट हे ऑनलाइन विक्री होणार आहे. तुम्हाला घरबसल्या ७० टक्केचा थेट लाभ होईल अशा भुलथापा देत गुंतवणुक करण्यास भाग पाडले.

असे घेतले टप्प्याटप्प्याने पैसेअन्न व औषधचे परवाने, दुकान परवाना यासाठी ४ लाख ४० हजार रुपये घेवून नंतर दुकानाचे डिपॉझीटसाठी ६० हजार घेतले. बियाणी पुता-पूत्रांनी पहिल्यांदा ४ लाख ४० हजार दुसऱ्यांदा १७ लाख ५० हजार, तिसऱ्यांदा १७ लाख ६० हजार असे एकूण ३९ लाख ५० हजार या देाघांच्या सांगण्यावरुन गुंतवणुक केली होती. ठरल्या प्रमाणे काही दिवस ७६ हजार रुपये प्रतिमहिना दराने पैसे मिळाले. नंतर आणखी गुंतवणीचा प्लॅन घेवून बियाणी पुतापुत्राला भाग पाडत होते. मात्र, त्यांनी अधिकची चौकशी केली असता हर्बालाईफची सिस्टर कंपनी केअर न्युट्रीशन कंपनीच अस्तीत्वात नसल्याचे उकडकीस आले. फेब्रुवारी महिन्यात हर्बोलाईफचे प्रॉडक्ट विक्रीचे दुकानही बंद झाल्याने आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्याने बियणी पिता-पुत्राने रामानंदनगर पेालिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यावरुन दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ करीत आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस