शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

मनपाच्या पाच कोटीच्या कामांना बसला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2019 1:07 PM

मंजुरी मिळूनही कामांचा प्रस्ताव महिनाभरापासून पडून विभागीय आयुक्तांकडे प्रस्तावच नाही

ठळक मुद्देहलगर्जीपणा

जळगाव : महापालिकेला शासनाकडून मिळालेल्या नगरोथ्थान अंतर्गत मिळालेल्या पाच कोटी रुपयांच्या विशेष निधीतील कामांना महिनाभरापूर्वी झालेल्या महासभेत मान्यता देण्यात आली. मात्र, मनपा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ५ कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव अद्याप विभागीय आयुक्त व शासनाकडे पाठविला गेलेला नाही. त्यामळे विकास कामांना ‘ब्रेक’ लागला आहे.नागरिकांच्या मुलभूत कामांसाठी मनपाला वर्षभरापूर्वी शासनाकडून पाच कोटी रुपयांचा विशेष निधी देण्यात आला होता. गेल्या दोन महिन्यापूर्वी प्राप्त झाला आहे. त्यातून शहरातील विविध भागातील विकास कामांचे प्रस्ताव तयार करण्यात आले. या निधीतील कामांवरुन सत्ताधारी भाजप व शिवसेनेत वाददेखील झाला होता. त्यानतंर ७ डिसेंबर रोजी झालेल्या विशेष महासभेत या कामांच्या प्रस्तावाला बहुमताने मान्यता देण्यात आली.मान्यता दिल्यानतंर आता एक महिना उलटत आला तरी अद्याप या प्रस्तावाची प्रक्रीयाच प्रशासनाकडून पूर्ण करण्यात न आल्याने या कामांना विलंब होत आहे. या कामांच्या नियोजनाला विभागीय आयुक्तांकडून मंजुरी गरजेचे आहे.मात्र, मनपा प्रशासनाकडून हा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यातच आलेला नाही. त्यामुळे महिनाभर हा प्रस्ताव मनपाकडेच पडून आहे.निधी नसल्याची तक्रार आणि निधी मिळाला तर नियोजन नाहीमनपाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याचे कारण मनपा प्रशासनाकडून दिले जाते व नागरिकांना त्यांच्या मुलभूत सुविधांपासून नेहमी वंचित ठेवण्याचे काम मनपाकडून केले जात आहे. एकीकडे आर्थिक परिस्थितीचे कारण मनपाकडून दिले जात असताना दुसरीकडे शासनाकडून मिळालेल्या निधीचे नियोजन देखील मनपाकडून केले जात नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. ५ कोटीच्या निधी मिळून त्याला मनपा महासभेने मंजुरी देवून देखील प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला नाही. हीच परिस्थिती २५ कोटी रुपयांच्या निधीदरम्यान पहायला मिळाली. तसेच आॅगस्ट मध्ये मनपाला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिलेली १०० कोटी रुपयांच्या निधीचे देखील नियोजन मनपा प्रशासनाकडून चार महिने उलटून देखील अद्यापपर्यंत करण्यात आलेले नाही. त्यामुळे मनपाचा भोंगळ कारभारामुळेच नागरिकांना सोयी सुविधांपासून वंचित रहावे लागत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.