शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

छातीत कळा, उलट्याही झाल्या; पण वेळेवर उपचार न मिळाल्याने महिलेचा झाला मृत्यू

By संजय पाटील | Published: October 05, 2022 12:17 PM

वेळेवर उपचार न मिळाल्याने महिलेचा झाला मृत्यू.

अमळनेर (जळगाव) : तिच्या छातीत कळा येऊ लागल्या...लागलीच उलट्याही झाल्या...बोरी नदीला पाणी ...गावासाठी बोट उपलब्ध नाही ...नदीतूध बैलगाडी चालेना... अखेर तिला झोळीत टाकले ..तिला घेऊन पाच जणांनी नदी पार करून दिली...पण दुर्दैवाने दसऱ्याच्या दिवाशी सकाळी महिलेनं जगाचा निरोप घेतला. वेळेवर उपचार न मिळाल्याने सात्री येथील महिला उषाबाई रामलाल भिल (५३) यांचा मृत्यू झाला.

सात्री गावाला स्वातंत्र्यपूर्वीपासून जायला रस्ता नाही. बोरी नदीवर पूल नाही. गावचे पुनर्वसन झाल्यामुळे विकास होत नाही. पुनर्वसित गावचे काम होत नाही. अनेक आंदोलने, अनेक समस्या उद्भवून देखील प्रशासन फक्त बैठक आणि तांत्रिक अडचणी दाखवून सात्री ग्रामस्थांच्या तोंडाला पाने पुसत आहेत. गेल्या वर्षी आरुषी नावाची ११ वर्षीय बालिकेचा  उपचाराअभावी मृत्यू झाला होता. तरीही प्रशासनाला जाग आली नाही. प्रशासन म्हणते १७ किमी वर अमळनेरला नगरपालिकेत बोट आणून ठेवली आहे. मात्र ग्रामपंचायतीला प्रशासनाने बोट उपलब्ध असल्याचे कळवलेले नाही. १७ किमीवरून बोट आणि कर्मचारी उपलब्ध करण्यासाठी किमान तास दीड तासाच्या वर कालावधी लागतो.

दसऱ्याच्या दिवशी पहाटे साडे तीन वाजता उषाबाई यांच्या छातीत कळा येऊ लागल्या. उलट्याही झाल्या. उजाडण्याची वाट पाहिली गेली. दवाखान्यात नेण्यासाठी नदी पार करायची होती. बैलगाडी पाण्यातून जाऊ शकत नव्हती. गावातील चार पाच लोकांना बोलावले. झोळी तयार करून उषाबाईंना झोळीत बसवून चार पाच जणांनी नदी पार केली. तोपर्यन्त बराच कालावधी उलटला होता. अमळनेरला आणले प्रकृती अत्यवस्थ म्हणून ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

प्रशासनाने सात्री पुनर्वसनाची आवश्यक निधीची तरतूद करून तांत्रिक अडचणी लवचिक करून रस्त्याचा मार्ग त्वरित काढावा. आणखी किती बळी जाण्याचा प्रशासन वाट पाहत आहे?महेंद्र बोरसे,माजी सरपंच, सात्री ता. अमळनेर

टॅग्स :Jalgaonजळगाव