शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

मुख्यमंत्र्यांनी डोळे वटारले की शिवसेनेच्या वाघाचे गुरगुरणे बंद : सुनील तटकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 18:43 IST

सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे मंत्री होण्यापूर्वी शेतकरी व सामान्यांच्या प्रश्नी खूप बोलायचे. मात्र त्यांचा आवाजच आता बंद झाला आहे अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रपरिषदेत केली.

ठळक मुद्देसरसकट कर्जमाफी होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादीचे आंदोलन सुरुच ठेवणारभाजपा आणि सेना यांच्यातील कुरघोडी आणि कुरबुरीमुळे जनतेचे मनोरंजनसहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे मंत्री होण्यापूर्वी शेतकरी व सामान्यांच्या प्रश्नी खूप बोलायचे. मात्र त्यांचा आवाजच आता बंद झाला.

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२१- सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे मंत्री होण्यापूर्वी शेतकरी व सामान्यांच्या प्रश्नी खूप बोलायचे. मात्र त्यांचा आवाजच आता बंद झाला आहे अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रपरिषदेत केली.यावेळी ते म्हणाले की, शिवसेना दुतोंडी असून मुख्यमंत्र्यांनी डोळे वटारले की, या वाघाचे गुरगुरणे बंद होते. भाजपा आणि सेना या दोन्ही पक्षातील कुरघोडी आणि कुरबुरीच्या प्रकारामुळे फुकटचा तमाशा लोकांना पहायला मिळत आहे, असेही तटकरे म्हणाले.फक्त फसव्या घोषणा करण्यापलीकडे या सरकारने काहीच केलेल नसून शेतकºयाला अजुनही कर्जमाफी मिळालेली नाही, बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकºयांना हेक्टरी ३० हजार रुपये देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. परंतु अद्याप ही मदत दिलेली नाही. आम्ही हल्लाबोल आंदोलनामध्ये शेतकरी आणि जनतेपर्यंत पोहचत असून सरकारविरोधात जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. उत्तर महाराष्ट्रातील सभाही न भूतो न भविष्यती अशा होत आहेत. सरकारविरोधात जनताच रस्त्यावर उतरत आहे.शेतकºयांना सरसकट कर्जमाफी होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणारतटकरे म्हणाले की, शेतकºयांची कर्जमाफी, शेतकºयांच्या आत्महत्या आणि धर्मा पाटील यांची आत्महत्या हे विषय येत्या अधिवेशनामध्ये आम्ही लावून धरणार आहोत. जोपर्यंत शेतकºयांना न्याय मिळत नाही आणि सरसकट कर्जमाफी दिली जात नाही तोपर्यंत राष्ट्रवादीचे आंदोलन सुरुच ठेवणार आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसJalgaonजळगावDevendra Fadnvisदेवेंद्र फडणवीस