शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारचं कामगारांना मोठं गिफ्ट! महिन्याला मिळतील ₹26000, कसं ते समजून घ्या
2
एमबीबीएस विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! एक कुटुंब दत्तक घ्यावे लागणार
3
डझनभर वंदे भारत ट्रेन ठरतायत पांढरा हत्ती; निम्म्या जागाही भरताना मुश्कील, महाराष्ट्रातील एक...
4
१५०० घरांची झडती, १०० पोलीस, प्लास्टिक कंटेनर...; ५ वर्षांच्या मुलीसोबत थरकाप उडवणारं कृत्य
5
"...नाहीतर अदानींकडून काॅन्ट्रॅक्ट काढून घेऊ", फडणवीसांचं धारावी प्रकल्पाबद्दल मोठं विधान
6
IND vs BAN, 2nd Test : जबरदस्त कॅच! पुन्हा पुन्हा रिप्लाय अन् जैस्वालचा प्रयत्न ठरला 'यशस्वी' (VIDEO)
7
"मी सिनेमा काढणार", संजय राऊतांनी नावही केले जाहीर; काय बोलले?
8
Vedanta Group : भंगार विकता विकता उभा केला कोट्यवधींचा व्यवसाय; पाहा Vedanta ची सुरूवात कशी झाली?
9
शेख हसिनांच्या विरोधात कोणी कारस्थान रचले? युनूसनी अमेरिकेत भर मंचावर नाव सांगितले
10
Exclusive: प्रिया बापटची Bigg Boss वर प्रतिक्रिया, म्हणाली, "तीनच लोक खरे वाटतात ते म्हणजे..."
11
स्टंटबाजीमुळे कालव्यात पडली कार; पोलिसांची मोठी कारवाई, ५ तरुणांची जेलमध्ये रवानगी
12
"अरबाजचा साखरपुडा झालाय वाटतं", आईचा मोठा गौप्यस्फोट ऐकून हादरली निक्की! अरबाजचे कपडे घेतले अन्...
13
शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, कुणी दिली होती पंतप्रधान पदाची ऑफर? नितीन गडकरी म्हणाले...
14
IPL 2025 : शाहरुखच्या KKR नं खेळला मोठा डाव; MS धोनीच्या सहकाऱ्यानं घेतली गौतम गंभीरची जागा
15
'आदिपुरुष'मधील रावणाच्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलला सैफ, म्हणतो- "आपण धर्मापासून लांबच..."
16
आता शेअर विकल्यास केवळ द्यावे लागणार ३.५ रुपये; कोट्यवधी गुंतवणूकदारांना फायदा; काय आहे नवा नियम?
17
Maharashtra Politics : 'अमित शहांना पवार, ठाकरेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे डोहाळे लागलेत'; ठाकरे गटाचा सामनातून हल्लाबोल
18
Tax Rule Changes : गॅस सिलिंडरपासून क्रेडिट कार्डापर्यंत, १ ऑक्टोबरपासून होणार 'हे' ५ बदल; खिशावर होणार परिणाम
19
India vs Bangladesh, 2nd Test : रोहितनं टॉस जिंकला, 'नो चेंज' म्हणत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय
20
आधी पॅरिस, आता अबू धाबी; ऐश्वर्यासोबत लेकीची परदेशवारी; नेटकरी म्हणतात, 'शाळा नाही...'

चिमणी दिन विशेष; सिलबंद खाद्यसंस्कृतीने हिरावला चिमण्यांचा घास!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 4:53 PM

जागतिक चिमणी दिवस : संकटांच्या मालिकेतही चिवचिवाट कायम

कुंदन पाटील

जळगाव : ग्रामीण भागात अंगणात धान्य पाखडले जायचे. त्यातून चिमण्यापाखरांसह अनेक पक्षी खाद्य वेचायला दाराशी यायचे. मात्र आता सीलबंद खाद्यसंस्कृतीसह ‘मॉल’मधील धान्याने जणू चिमण्यांचा घासच हिरावला आहे, असेच चित्र सर्वदूर आहे.

चिमण्यांचा सात्विक चिवचिवाट जपण्यासाठी शासनासह अनेक पक्षीप्रेमी संघटनांनी उपाययोजना हाती घेतल्या आहेत.  भारतात सगळीकडे सर्वात जास्त संख्येने सापडणारा, विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा, माणसाच्या जवळपास राहणारा आणि त्यामुळे नेहमी दिसणारा पक्षी म्हणून चिमण्यांची ओळख आहे. परंतु दिवसेंदिवस होत चालल्या बदलामुळे आता चिमण्यांच्या वास्तव्याला धोका निर्माण झाला आहे. यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी २० मार्च हा दिवस ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून  साजरा केला जात आहे.

गेल्या २५ वर्षांत सर्वाधिक घट झालेल्या प्रजाती :

१) पांढऱ्या पुठ्ठय़ाचे गिधाड (व्हाईट रम्पड् व्हल्चर)२) रिचर्डची चिमणी (रिचर्ड्स पिपिट)३) भारतीय गिधाड (इंडियन व्हल्चर)४)सोन चिखल्या (पॅसिफिक गोल्डन प्लोवर)५)  बाकचोच तुतारी (कल्र्यू सॅण्डपायपर)घट कशामुळे?१.उद्योगीकरणामुळे वातावरणात झालेला बदल आणि वाढते प्रदूषण.२.शहरीकरण व लोकांचे बदलते राहणीमान, सिमेंटची घरांमुळे चिमण्यांचा रहिवास धोक्यात आला आहे. आधीच्या काळात कौलारू घरे व त्यासमोर असणाऱ्या विहिरींमुळे चिमण्यांचा मोठ्या प्रमाणावर रहिवास होता. ३.कमी होत चाललेली जंगले आणि शहरात निर्माण झालेली मोबाईल टॉवर्स व तारांची जंगले.४.पिकांवर हानीकारक रासायनिक खतांची आणि किटकनाशकांची होणाऱ्या फवारणीतून विषबाधा झालेल्या चिमण्या मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.५.विणीच्या हंगामात (प्रजननकाळात) चिमण्यांना मानवी आणि तंत्रज्ञानातील बाबींचा होणारा त्रास.संवर्धनाची गरजपाणथळीच्या जागांची निर्मिती करणे व त्यासोबतच धान्य सुद्धा उपलब्ध करून देणे. उरलेले अन्न पक्षांना टाकणे. घराजवळ, बाहेर चिऊताईसाठी दाणा-पाणी ठेवणे.पक्षांच्या वावरासाठी नैसर्गिक परिवास निर्माण करणे.शेतीसाठी हानीकारक रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर कमी करणे.चिमणीला बाभळीसारख्या नैसर्गिक अधिवासाबरोबरच घरटे बांधण्यास अनुकूल गोष्टी उपलब्ध करून देणे, घराभोवती शक्य असल्यास छोटी झाडेझुडुपे लावणे.कोटचिमण्यांच्या आयुष्याचे जतन करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. चिमण्यांचा दाराशी आणि अंगणात असणारा रहिवास आरोग्याच्यादृष्टीने नक्कीच ऊर्जादायी आहे. त्यामुळे प्रत्येकाने चिऊतांईसाठी पाणी, अन्न दाराशी उपलब्ध करावे आणि सात्विक चिवचिवाटाचे धनी व्हावे.-अश्विन लिलाचंद पाटील, संस्थापक अध्यक्ष, उडान पक्षीमित्र संस्था अमळनेर

टॅग्स :Jalgaonजळगाव