शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे आज असते, तर अजित पवारांना भाजपसोबत घेतलं असतं का?; धनंजय मुंडे म्हणाले...
2
माझी लाडकी बहीण योजना बंद होण्याची चर्चा; अदिती तटकरेंनी केला खुलासा 
3
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शिवसेनेत, जेलमधून परतताच पक्षप्रवेश
4
IND A vs Pak A : 'हायहोल्टेज' मॅच! युवा टीम इंडियानं दिला पाकिस्तान 'अ' संघाला दणका
5
Maharashtra Election 2024: नितीन गडकरींच्या घरी फडणवीस-बावनकुळेंचे 2 तास खलबते
6
IND vs PAK : कॅचेस विन मॅचेस! Ramandeep Singh च्या अफलातून कॅचनं फिरली मॅच (VIDEO)
7
Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?
8
राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी; पुतणीने शरद पवारांना विचारला खरमरीत सवाल!
9
‘वंचित’कडून विधानसभेसाठी आणखी १६ उमेदवारांची घोषणा; साताऱ्यातील २ जागांचा समावेश!
10
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
11
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
13
Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा
14
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
15
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
16
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
17
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
18
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...
19
'वादळवाट', 'आभाळमाया' मालिकांचे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "...तर महाराष्ट्रात पडसाद उमटतील", बाबासाहेब देशमुखांनी ठाकरेंची चिंता वाढवली!

विजेच्या लपंडावाने नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2017 11:44 AM

जळगाव तालुक्यातील स्थिती : पाणी पुरवठा ठप्प व पिठाच्या गिरण्या बंद

ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.9 - मृग नक्षत्राच्या प्रारंभीच जोरदार पावसाने हजेरी लावून जळगावकरांना दिलासा तर मिळाला, मात्र वीज गूल झाल्याने बुधवारी व गुरुवारी संध्याकाळ र्पयत विजेचा चांगलाच ‘झटका’ सहन करावा लागला. 
    बुधवारी रात्री अनेक भागात तीन-तीन तास वीज गायब असल्याने तर गुरुवारीही दिवसभर विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिक चांगलेच घामाघूम झाले. आधीच पाणीपुरवठा विस्कळीत असताना काही भागात उशिरा पाणी आले, मात्र वीजच नसल्याने नागरिकांना पाण्यापासूनही वंचित रहावे लागले. 
तीन दिवसांपूर्वी झालेल्या मान्सूनपूर्व पहिल्याच पावसाने वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर दोन दिवसात कोठे काही मान्सूनपूर्व कामे बाकी आहे का? याची पाहणी न झाल्याने बुधवारी रात्री पुन्हा पाऊस सुरू होताच वीज गूल झाली. त्यात जोरदार पाऊस असल्याने बिघाड काढला गेला नाही व अनेक भागात तीन-तीन तास वीज पुरवठा खंडित राहिला. 
खंडित विजेमुळे पाणी मिळेना
गेल्या पाच दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठाही विस्कळीत झाला आहे. दररोज एक-एक दिवस पाणीपुरवठा पुढे ढकलला जात आहे. मात्र पुन्हा वीज गूल होऊन ठरलेल्या दिवशीही पाणीपुरवठा होऊ शकत नसल्याचे चित्र आहे. अशाच प्रकारे बुधवारी रात्री नंदनवनकॉलनी परिसरात कसेबसे नळांना पाणी आले, मात्र नेमके त्याचवेळी वीज खंडित झाल्याने रहिवाशांना पाणी मिळू शकल ेनाही.