शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अर्थसंकल्पाबाबत जळगावात संमिश्र प्रतिक्रिया, कृषी क्षेत्राच्या तरतुदीमुळे उद्योगांना फायदा होण्याची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 22:51 IST

व्यापार, उद्योगांच्या पदरी निराशा

ठळक मुद्देउद्योगांसाठी मोठी घोषणा नाहीचस्थानिक कर ‘जैसे थे’

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ९ - केंद्राप्रमाणे राज्याच्याही अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली असल्याने त्याचा फायदा सर्वच क्षेत्रांना होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र कोट्यवधींचा कर भरणाºया व्यापारी, उद्योजकांसाठी भरीव उपाययोजना नसल्याने या क्षेत्रात नाराजीचा सूर असला तरी कृषी क्षेत्रामुळे फायदा होणार असल्याचा सूर आहे, यामुळे एकूणच अर्थसंकल्पाबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे.शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झाला. या बाबत व्यापारनगरी तसेच डाळ व पाईप उद्योगांचे माहेर घर असलेल्या जळगावातील उद्योजक, व्यापाºयांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता निवडणुका डोळ््यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर केल्याचाही सूर उमटला.कोट्यवधींचा कर भरणाºयांची निराशाराज्यातील व्यापाºयांकडून दरवर्षी सरकार १ लाख ६५ हजार कोटी रुपयांचा कर वसूल करते. मात्र त्यांचा या अर्थसंकल्पात विचार झाला नसल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे. कृषी क्षेत्रासाठी तरतूद केली असली तरी सध्या शेतकºयांची बिकट स्थिती व सरकारबद्दलची त्यांची नाराजी ओळखून सरकारने २०१९च्या निवडणुकांचा विचार करीत कृषी क्षेत्रासाठी ही तरतूद केली असल्याचेही व्यापाºयांचे म्हणणे आहे.राज्य सरकारी कर्मचाºयांना सातवा वेतन आयोगाबाबत सरकारने घोषणा केली, मात्र त्याची अंमलबजावणी कधी व कशी करणार याबाबत ठोस सांगितलेले नाही. कर्मचाºयांना आयोग मिळाल्यास त्याचा थेट फायदा बाजारपेठेत होतो, त्यामुळे हा आयोग लवकर लागू होण्याची अपेक्षा व्यापारी वर्गातूनही होत आहे.स्थानिक कर ‘जैसे थे’मूल्यवर्धीत कर (व्हॅट) व इतर कर जीएसटीमुळे नसले तरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर, व्यवसाय कर अद्यापही भरावे लागत आहे. ते रद्द होण्याची अपेक्षा होती, मात्र तसे न झाल्याने नाराजी आहे.उद्योगांसाठी मोठी घोषणा नाहीचपायाभूत सुविधांमध्ये रस्ते उभारणीची घोषणा असली तरी उद्योगांसाठी मोठी घोषणा नसल्याने अपेक्षाभंग झाल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.शीतगृहांमुळे फायदाशेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करणे तसेच शीतगृह उभारणी यामुळे कृषी माल व एकूणच शेतकºयांना फायदा होणार आहे. यामुळे माल जास्त दिवस टिकून राहील, वर्षभर बाजारपेठेत चांगला माल येईल व भाव स्थिर राहण्यास मदत होईल, यामुळे बाजारपेठ, उद्योगांनाही फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शेतकºयांची स्थिती सुधारल्यास कृषी पूरक डाळ, पाईप उद्योगांनाही फायदा होईल, असा सूर उद्योजकांकडून उमटला.कौशल्य विकास मार्गदर्शनामुळे फायदाविदेशात शिक्षणासाठी जाणाºया विद्यार्थ्यांना आता सरकारच कौशल्य विकासाबाबत मार्गदर्शन करण्याची घोषणा करण्यात आल्याने त्याचा फायदा विद्यार्थ्यांना व उद्योगांना होईल, असे उद्योजकांचे म्हणणे आहे.कृषी क्षेत्रातील तरतुदींमुळे सर्वच क्षेत्रांना फायदा होण्यासाठी कौशल्य विकास मार्गदर्शनामुळे उद्योगांनाही फायदा होईल. मात्र उद्योगांसाठी अपेक्षित असलेली मोठी घोषणा नाही.- प्रेम कोगटा, अध्यक्ष, जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशन.कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद केल्याने कृषी पूरक उद्योगांना फायदा होणार आहे. या सोबतच पायाभूत सुुविधांवर सरकारचा भर असल्याने त्यास नवीन उद्योग येण्यास चालना मिळण्याची अपेक्षा आहे.- अंजनीकुमार मुंदडा, प्रदेश सचिव, लघु उद्योग भारती.शीतगृहांमुळे शेतीमाल तसेच बाजारपेठेसही फायदा होईल. मात्र स्थानिक कर कमी रद्द होण्याची अपेक्षा होती, ते झाले नाही.- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, गे्रन किराणा मर्चंट असोसिएशननिवडणुका डोळ््यासमोर ठेवून कृषीसाठी उपाययोजना करण्याचे सरकारचे धोरण दिसून येत आहे. कोट्यवधी कर भरणाºया व्यापाºयांनाच्या पदरी अर्थसंकल्पातून निराशा पडली आहे.- पुरुषोत्तम टावरी, उपाध्यक्ष, राज्य व्यापारी महासंघ.

टॅग्स :JalgaonजळगावBudget 2018अर्थसंकल्प २०१८