शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
2
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
3
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
4
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
5
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
6
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
7
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
9
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
10
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
11
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
12
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
13
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
14
Weightless Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!
15
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
16
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
17
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
18
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
19
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
20
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट

वॉटरग्रेस कंपनीचा सावळागोंधळ सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 4:11 AM

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहराच्या दैनंदिन सफाईचा मक्ता दिलेल्या वॉटरग्रेस कंपनीकडून कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी मातीचा वापर करण्याचे काम ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहराच्या दैनंदिन सफाईचा मक्ता दिलेल्या वॉटरग्रेस कंपनीकडून कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी मातीचा वापर करण्याचे काम अद्यापही सुरुच आहे. आता शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी यांनी स्वत: याबाबतचा व्हिडीओ तयार करून हा प्रकार उघडकीस आणला आहे. वॉटरग्रेसला मनपाने नव्याने संधी दिल्यावर वॉटरग्रेसविरोधात नगरसेवकांचा आवाज कमी झाला आहे. तरी शहरातील साफसफाईची समस्या कायम असून कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून वजन वाढविण्यासाठी होत असलेल्या जुगाडावर कोणीही बोलायला तयार नसल्याचे दिसून येत आहे.

शहरातील ओंकारेश्वर मंदिर परिसरात रविवारी व सोमवारी देखील वॉटरग्रेस कंपनीच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून थेट कचऱ्याऐवजी माती उचलली जात होती. याबाबत शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी यांनी या प्रकाराचा व्हिडीओ तयार केला असून, मनपा सहाय्यक आयुक्त पवन पाटील यांना पाठवून याबाबत तक्रार देखील केली आहे. याआधी देखील राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी देखील मनपाकडे या प्रकाराबाबत तक्रार दाखल केली होती. अनेक महिन्यांपासून शहरात संबधित कंपनीकडून असे प्रकार सुरु असून, याकडे कोणताही नगरसेवक व प्रशासन देखील दुर्लक्ष करत आहे.

वजनाच्या मापात ‘पाप’

वॉटरग्रेसला मक्ता दिल्यानंतर मक्तेदाराच्या कर्मचाऱ्यांकडून कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी त्यात माती, दगड, वृक्षांच्या फांद्या देखील टाकल्या जात आहे. मनपाने कचऱ्याचा एका टनासाठी ९७० रुपये दर निश्चित केला आहे. दररोज शहरातून सरासरी २७० टन कचरा उचलला जात आहे. अनेकदा ३०० टन पर्यंत कचरा उचलला जात आहे. कचऱ्याचा मापात ‘पाप’ करून मोठ्या रक्कमेचे बीलं मनपाकडून वसुल केले जात आहेत. सुरुवातीला नगरसेवकांकडून विरोध होत असल्याने त्यावर काही प्रमाणात अंकुश होते. मात्र, दुसऱ्या टप्प्यात नगरसेवकांचा विरोध कमी झाल्याने मक्तेदाराला मोकळे रानच मिळाले आहे.

मनपा प्रशासनाचेही दुर्लक्ष

या प्रकाराकडे मनपा प्रशासन देखील फारसे गांभिर्याने लक्ष द्यायला तयार नाही. विशेष म्हणजे वॉटरग्रेसला सर्व पैसा मनपाच्या तिजोरीतूनच जात असताना, प्रशासन याबाबत वॉटरग्रेसवर कारवाई करण्यास मागे का हटत आहे ? असा प्रश्न यामुळे निर्माण होत आहे.

कोट..

शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी यांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्या जागेवर जावून प्रत्यक्ष पाहणी केली. यामध्ये वॉटरग्रेसच्या कर्मचाऱ्यांनी वजन वाढविण्यासाठी करारनाम्यातील अटी-शर्थींचा भंग केल्याचे आढळून येते. याबाबत या कंपनीला ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

-पवन पाटील, सहाय्यक आयुक्त