शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
2
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
3
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
4
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
5
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
6
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
7
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
8
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
9
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
10
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
11
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
12
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
13
'भाऊ बोलून गळा पकडायचा!' अंकिताने सूरजला केलं टार्गेट, DP चांगलाच भडकला! प्रोमो बघाच
14
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
15
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
16
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
17
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
18
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
19
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
20
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी

‘कॉपीमुक्ती’चा असाही परिणाम होणार; दहावी, बारावीचे निकाल १० टक्क्यांनी कमी लागणार

By अमित महाबळ | Published: February 21, 2023 5:59 PM

कोरोनामुळे गेली दोन वर्षे शाळेतच परीक्षा केंद्र होती. यंदा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बाहेरची मिळालेली आहेत.

 जळगाव : कॉपीमुक्त परीक्षा अभियानाचे शिक्षण क्षेत्रातून स्वागत होत आहे. बारावीचे यापुढील उर्वरित पेपर आणि दहावीच्या परीक्षेलाही वातावरण असेच टाईट ठेवले गेले तर यंदा दहावी आणि बारावीच्या निकालातील गुणांचा फुगवटा १० टक्केने कमी होणार असल्याचे मत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

कोरोनामुळे गेली दोन वर्षे शाळेतच परीक्षा केंद्र होती. यंदा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बाहेरची मिळालेली आहेत. कॉपीमुक्त परीक्षा अभियानातील बंदोबस्त, भरारी पथके, विविध उपाययोजना या सर्वांचा परिणाम यावर्षीचा दहावी आणि बारावीचा निकाल १० टक्के कमी लागण्यात होणार आहे. थोडक्यात गुणांचा फुगवटा कमी होईल. कडक धोरण, नियमांमुळे हे शक्य होणार आहे. परंतु याचा परिणाम केवळ शहरी भागातच जाणवेल. ग्रामीण भागाचे काय ? अशी प्रतिक्रिया शिक्षण तज्ज्ञ चंद्रकांत भंडारी यांनी दिली.

प्रशासनाने ही केंद्रे बदलावीत -केंद्राचा निकाल चांगला लागावा म्हणून आतमध्ये काय घडते, कोणाकोणाला काय मदत केली जाते हे उघड गुपित आहे. संवेदनशील केंद्र दर्शवून तेथे कॉपी होत असल्याचे एका अर्थी मान्य केले जात आहे. प्रशासनाने ही केंद्रे बदलायला हवीत. बंदोबस्त बाहेर कितीही लावला तरी आतमध्ये जे व्हायचे तेच होते, असेही भंडारी म्हणाले.

विद्यार्थ्यांना आकलन शक्ती कळेल

कॉपीमुक्त परीक्षा अभियानासाठी प्रशासनाने केलेले नियोजन चांगले होते. बारावीचे उर्वरित पेपर आणि दहावीच्या परीक्षेसाठी याच पद्धतीने कडक अंमलबजावणी व्हावी. यामुळे निकालातील गुणांचा फुगवटा कमी होण्यास मदत होईल. यानिमित्ताने विद्यार्थ्यांनाही आपली आकलन शक्ती कळून येईल, असे नंदिनीबाई कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. राहुल वराडे यांनी सांगितले. 

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थीSchoolशाळा