शहरं
Join us  
Trending Stories
1
हर्षवर्धन पाटलांचा भाजपाला रामराम; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा
2
इंदापूरात भाजपाचे बॅनर्स हटवले; हर्षवर्धन पाटील 'तुतारी' चिन्हावर विधानसभा लढणार?
3
संयुक्त राष्ट्रात भारतानं काढली पाकिस्तानची खरडपट्टी; जगाला दाखवला 'दहशतवादी' चेहरा
4
Mumbai: बापच 5 वर्षांपासून करत होता बलात्कार; अल्पवयीने मुलीने व्हिडीओ बनवून...
5
भाजपा नेत्याने राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे जाहीरच केले; व्हिडीओ पाहून शरद पवारही चकीत
6
Supriya Sule : "दुर्दैवाने महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहिलेला नाही"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप
7
राहु नक्षत्रात शनी गोचर: ६ राशींची प्रगती, बचतीत यश; व्यवसायात नफा, नवीन नोकरीची संधी!
8
Navratri 2024: देवीच्या आरतीतलं प्रत्येक कडवं जणू काही देवीशी प्रत्यक्ष संवादच; वाचा भावार्थ!
9
पुणे हादरलं! मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
10
Navratri 2024: नवरात्रीत केवळ डिजेवर नाचून नाही तर 'अशी' करा शक्तीची उपासना!
11
"ट्रेनचा स्पीड कमी करुन..."; वंदे भारतवर दगडफेक करणाऱ्याने सांगितलं धक्कादायक कारण
12
Women's T20 World Cup, INDW vs NZW : कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
13
भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने काय बदल होतात? नागपूरकरांनी लढलेला दीर्घ लढा अखेर यशस्वी
14
"त्या सिनेमाचा हिरो रात्री १२ वाजता मला...", मल्लिका शेरावतचा खुलासा, नेटकऱ्यांनी लावला अंदाज
15
"मला संपवू नका, मीच राहिलो नाही, तर तुम्ही...", अशोक चव्हाणांचे विधान चर्चेत
16
...तर शरद पवारांसोबत चर्चा करू; MIM च्या मविआतील प्रवेशावर ठाकरे गटाची भूमिका
17
खळबळजनक! "तुमची मुलगी एका..."; डिजिटल अरेस्ट, ८ कॉल, 'त्या' फोनने आईला हार्ट अटॅक
18
अभिजात दर्जासाठी पहिली समिती ते आतापर्यंतचा प्रवास... अखेर तेव्हापासूनच्या प्रयत्नांना यश
19
आता GPay युझर्सना मिळणार Gold Loan; 'या' कंपनीसह झाला करार, पाहा डिटेल्स
20
शेअर बाजार उघडताच पुन्हा विक्री सुरू, सेल ऑन राइजमध्ये अडकला बाजार; BPCL, एशियन पेंट्स आपटला

कोरोनाचा संसर्ग कमी, प्रशासनाकडून वाढल्या अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 4:19 AM

कोरोना संसर्ग कमी झाल्याने सर्वांनाच दिलासा मिळत आहे. याचा सर्वात मोठा आधार रोजंदारी करणाऱ्यांना तसेच विविध व्यावसायिकांना होणार ...

कोरोना संसर्ग कमी झाल्याने सर्वांनाच दिलासा मिळत आहे. याचा सर्वात मोठा आधार रोजंदारी करणाऱ्यांना तसेच विविध व्यावसायिकांना होणार आहे. त्यामुळे आता कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्याने सर्वांच्याच प्रशासनाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. लवकरात लवकर निर्बंध शिथिल करीत व्यवहार पूर्वपदावर यावे, असे सर्वांनाच वाटत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांना यश येत असल्याने आता प्रशासनानेच सामान्यांच्या रोजंदारीचाही विचार करावा, असा सूर आता उमटू लागला आहे. मात्र हे करीत असताना गर्दीवर नियंत्रण मिळविणे प्रशासनाची जेवढी जबाबदारी राहणार आहे, तेवढीच व्यावसायिक, कामगार, सामान्य नागरिक यांचीही जबाबादारी राहणार आहे. गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर उसळलेली गर्दी किती घातक ठरली हे सर्व जिल्हावासीयांनी अनुभवले. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी महिन्यापासून संसर्ग ‌‌वाढत गेल्याने एप्रिल महिन्यापासून पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले. त्यानंतर १ जूनपासून काहीसी शिथिलता मिळाली व ७ जूनपासून अनलॉक होऊन सर्वच व्यवहार सुरू झाले. मात्र डेल्टा प्लसने घात केला. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून निर्बंध लागू झाले. यामुळ‌े विविध व्यवसायांवर परिणाम होण्यासह रोजंदारी करणाऱ्यांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र आता आठवडाभरातील स्थिती पाहता मोठे दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग झपाट्याने कमी होत असून रिकव्हरी रेटदेखील वाढत जाऊन ९७.९१ टक्क्यांवर पोहचला आहे. यामध्ये गेल्या रविवारपासून लागू करण्यात आलेल्या निर्बंधादरम्यान रुग्णसंख्या कमी-कमी होत जाऊन आठवड्याभराच्या तुलनेत रुग्णसंख्या १४ टक्क्यांवर आली आहे तर पॉझिटिव्हिटी केवळ ०.२० टक्क्यांवर आहे. प्रशासनाने कोरोना रोखण्यासाठी वेळोवेळी निर्बंध लागू केले. त्यानंतर आता स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याने प्रशासनाचे यश पाहता प्रशासनानेच योग्य उपाययोजना करीत निर्बंध शिथिल करण्याची अपेक्षा जिल्हावासीयांकडून व्यक्त होत आहे. तसे पाहता राज्य सरकारने स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाला दिले असले तरी कोरोना संसर्गाच्या पाच टप्प्यातील पहिल्याच टप्प्यात जळगाव जिल्हा असला तरी जिल्ह्यात डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आल्याने जळगाव जिल्ह्याचा राज्य सरकारने तिसऱ्या टप्प्यात समावेश केला. आता जिल्ह्यातील स्थिती सुधारत असल्याने राज्य सरकारनेही या विषयी विचार करावा. जिल्हा प्रशासनाने कोरोना काळात मोठा तुटवडा निर्माण झालेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचे वितरण स्वत:च्या नियंत्रणाखाली केल्याने तसेच म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी आवश्यक इंजेक्शनची माहिती, उपलब्धता याविषयी माहिती देण्याच्या दिलेल्या सूचना पाहता योग्य उपाययोजना होऊन स्थिती पूर्वपदावर येण्यास मदत झाली. त्यामुळेच आता जिल्हावासीयांच्या प्रशासनाकडून अपेक्षा वाढल्या आहेत.