शहरं
Join us  
Trending Stories
1
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
3
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
4
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
5
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
6
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
7
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
8
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
9
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
10
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
11
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
12
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
13
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
14
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
15
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते
16
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
17
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
18
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
19
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
20
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा

जळगाव जिल्ह्यात 40 हजार हेक्टरवर कापसाची लागवड

By admin | Published: June 14, 2017 5:22 PM

कोरडवाहू कापसाची लागवड मात्र थांबली आहे

ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 14 - जिल्हाभरात आतार्पयत विविध खरीप पिकांची 52 हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. त्यात एकटय़ा कापसाची 40 हजार हेक्टरवर लागवड झाली असून, या क्षेत्रात पूर्वहंगामी किंवा बागायती कापसाचे क्षेत्र 35 हजार हेक्टर एवढे आहे. कोरडवाहू कापसाची लागवड मात्र थांबली आहे. मान्सूनपूर्व पाऊस सर्वत्र बरसला. परंतु मागील दोन दिवसांपासून पाऊस नाही. काही भागात तुरळक पाऊस सुरू आहे. जिल्हाभर मान्सूनपूर्व पाऊस झाल्यानंतर मशागतीची कामे गतीने झाली. परंतु नंतर पावसाबाबत अनुकूल स्थिती नसल्याने पेरण्या थांबल्या. तापीकाठावरील काही भागामध्ये पेरण्या झाल्या. या भागाचा अपवाद वगळता इतरत्र पेरण्या झालेल्या नाहीत. कडधान्य, तृणधान्य, गळीत धान्य यांची पेरणी किंवा लागवड थांबली आहे. सोयाबीन, तूर या पिकांना उगवणीसाठी 40 मि.मी.पेक्षा अधिक पावसाची गरज असते. पण एवढा पाऊस मागील दोन दिवसात नसल्याने पेरण्या थांबल्या आहेत. शेतकरी पुरेशा पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पेरणीसाठी 40 मि.मी. पावसाची गरज असते. एवढा पाऊस मागील आठवडय़ात काही तालुक्यांमध्ये झाला. नंतर मात्र पाऊस नाही. सद्य:स्थितीत पेरणी टाळावी. आणखी पाऊस बरसल्यानंतर पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. जिल्हाभरात 52 हजार हेक्टरवर पेरण्या झालेल्या असल्या तरी त्यात एकटय़ा कापसाचे क्षेत्र 40 हजार हेक्टर आहे. उर्वरित 12 हजार हेक्टरवर सोयाबीन, ज्वारी, तूर, उडीद मूग या पिकांची पेरणी झाली आहे. 35 हजार हेक्टरवर पूर्वहंगामी (बागायती) कापसाची लागवड झाली आहे. कृत्रीम जलसाठा उपलब्ध असलेले शेतकरी कापूस लागवड करीत आहेत. कापसाची लागवड सुरूच आहे. पण कोरडवाहू शेतक:यांनी मात्र कापसाची लागवड सुरू केलेली नसल्याचे चित्र आहे. कोरडवाहू कापसाची लागवड मागील अठवडय़ात काही भागात झाली. त्याची आकडेवारी पाच हजार हेक्टर्पयत असल्याचा अंदाज आहे.