शहरं
Join us  
Trending Stories
1
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
3
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
4
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
5
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
6
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
7
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
8
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
9
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
10
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
11
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
12
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
13
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
14
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
15
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते
16
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
17
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
18
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
19
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
20
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा

बाबा...चोरी झाली तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2021 4:12 AM

बाबा...चोरी झाली तर... जळगावात चोर्यांचे सत्र सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी दुचाकी चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला होता. भरदिवसात रूग्णालये, बसस्थानक ...

बाबा...चोरी झाली तर...

जळगावात चोर्यांचे सत्र सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी दुचाकी चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला होता. भरदिवसात रूग्णालये, बसस्थानक एवढेच नव्हे तर अपार्टमेंटच्या कंपाउंडमधून दुचाकी चोरीला जात होत्या. चोरट्यांनी डोकेवर काढले आहे. आव्हाण्यातील १२ बंद घर टार्गेट करून घरफोड्या करित हजारोंचा ऐवज लंपास चोरट्यांनी लंपास केला. एकाच रात्री बारा घरांमध्ये चोरी झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे कुठे बाहेरगावी जाणे नागरिकांना महाग पडत आहे. पोलिसांनी गस्त वाढवित, चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, घर सोडून जाणार नाही रे भो...अशी चर्चा गावातील कट्टयांवर ऐकायला मिळत आहे. अनलॉकनंतर अनेकांनी बाहेर फिरण्याचा बेत आखला आहे. त्यातच कुलूप बंद घर टार्गेट करून चोरटे हात साफ करीत आहेत. मध्यंतरी दुचाकी चोरट्यांनी जळगावकर हैराण झाले होते. एवढेच नव्हे तर बसस्थानकावर सुध्दा गर्दीचा फायदा घेवून मंगळसूत्र चोरून नेण्याच्या घटना तर नित्याच्याच झाल्या होत्या. शहरात सुरू असलेल्या चोरीच्या घटना कधी थांबतील, अशी चर्चा आता गल्ली बोळात सुध्दा ऐकायला मिळत आहेत. चोरीच्या घटनांप्रमाणे खूनाच्या घटनाही शहरात वाढल्यामुळे कधी जळगावात क्राईम रेट कमी होईल, अशी चर्चा सर्वसामान्यांमधून ऐकायला मिळत आहे. त्यामुळे चोरट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

सागर दुबे