शहरं
Join us  
Trending Stories
1
Haryana Assembly Election Results 2024 हरियाणात भाजपचा विजयी रथ का रोखू शकली नाही काँग्रेस? ही आहेत 5 महत्वाची कारणं
2
अवघ्या २०० दिवसांत 'त्यांनी' सूत्रं हलवली, पुन्हा भाजपाची सत्ता आणून दाखवली! हरयाणातील 'मॅन ऑफ द मॅच' 
3
"भाजपाशी थेट लढाई असते तिथे काँग्रेस कमीच पडते"; ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा खोचक टोला
4
Haryana Results 2024: भाजपाने हरयाणा जिंकले, पण पाच मंत्री हरले; कोणी केला पराभव?
5
देशातील सर्वात श्रीमंत महिलेला भाजपनं तिकीट नाकारलं, पण अपक्ष म्हणून निवडणूक लढविली अन् जिंकलीही...
6
Haryana Assembly Election Results 2024 : बाजी हातातून निसटताना भाजपाने केली खेळी; हरयाणात या समि‍करणामुळे झाली उलथापालथ
7
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: जम्मू काश्मीरचा अंतिम निकाल हाती, पाहा कुठल्या पक्षाला किती जागा...
8
जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची 'बाजी', पण भाजपा 'बाजीगर'; जागा वाढल्या अन्...
9
सूरज चव्हाण बिग बॉस जिंकल्यावर मराठी अभिनेत्री म्हणते, 'छपरीपणा सुरु करायला हवा...'
10
हरियाणातील निकालामुळे राज्यात काँग्रेसवर दबाव?; पृथ्वीराज चव्हाणांनी मांडली भूमिका
11
भाजपची रणनीती कामी आली; हरयाणात 'ऑल इज वेल', शेतकरी-जवान नाराज नाहीत..!
12
"तुम्ही मला मत दिलं, तर मी तुम्हाला चंद्रावर घर देईन", उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
13
SEBI नं १०० पेक्षा अधिक स्टॉक ब्रोकर्सना पाठवली नोटीस, काय आहे कारण; जाणून घ्या
14
कोण आहेत मेहराज मलिक? ज्यांच्यासाठी अरविंद केजरीवालांचा 'झाडू' चालला; भाजपचा किती मतांनी केला पराभव?
15
जयराम रमेश यांनी डेटा अपडेटमध्ये उशीर केल्याचा आरोप केला; निवडणूक आयोगाने प्रत्येक मिनिटांचे उत्तर दिले
16
Uddhav Thackeray : "गद्दारांना ५० खोके आणि बहिणीला फक्त १५०० रुपये; हा महाराष्ट्रधर्म नाही" - उद्धव ठाकरे
17
ढोल वाजवले, फटाके फोडले; लाडू, जिलेबी वाटली, पण… काँग्रेसच्या उत्साही कार्यकर्त्यांवर नामुष्की 
18
"...हाच आजच्या निवडणूक निकालाचा धडा"; अरविंद केजरीवाल निकालावर काय म्हणाले?
19
ओमर अब्दुल्ला होणार जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री; विजयानंतर फारुख अब्दुल्लांची घोषणा
20
'त्या' लोकांना दहशतवाद्यांसारखी वागणूक द्या; तुषार गांधींची उद्धव ठाकरेंकडे मागणी

धरण उशाशी अन् कोरड घशाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 3:14 PM

तोंडापूर धरणालगत असलेल्या शेती परिसरात अत्यल्प पावसामुळे विहिरी व जलसाठ्यांची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे विहिरी, बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. धरणाच्या जवळ असलेल्या गावातील पिकांची पाण्याअभावी अवस्था नाजूक झाली आहे.

ठळक मुद्देतोंडापूर परिसरात केळी बागा सुकल्यायंदाचे वर्ष शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळतोंडापूर धरणात शून्य टक्के जलसाठा

तोंडापूर ता.जामनेर : तोंडापूर धरणालगत असलेल्या शेती परिसरात अत्यल्प पावसामुळे विहिरी व जलसाठ्यांची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे विहिरी, बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. धरणाच्या जवळ असलेल्या गावातील पिकांची पाण्याअभावी अवस्था नाजूक झाली आहे.तोंडापूर गावाला लागुनच मोठे धरण आहे. पावसाळ्यात धरण भरल्यावर सर्वच शेतकºयांना त्याचा लाभ होत असे. यावर्षी धरणात मुबलक साठा वाढणार या आशेने तोंडापूर येथील १०० पेक्षा जास्त शेतकºयांनी शेतात प्रत्येकी पंधरा ते पंचवीस हजार केळी खोडांची लागवड केली. केळी बागांना पुरेशे खतपाणी घातल्यानंतर बाग काटणीवर येण्याआधीच पाण्याअभावी सुकत आहेत. काहींची बाग लहान असतानाच मोठ्या झाडांना वाचवायचे की लहान बागांना या चिंतेने लाखो रुपये खर्च करीत लहान बागांना वाºयावर सोडण्याची वेळ आली.काही शेतकºयांनी केळी बागांवर नांगर चालविला आहे.गावातील सुनील कालभिले यांची दहा हजार बाग, जगदीश पाटील यांची पंधरा हजार, डी.के.पाटील यांची पंचवीस हजार केळीबाग, जाकिर पटेल यांची सहा हजार, संतोष ढेपले यांची चार हजार बाग पाण्याअभावी सुकत असल्याची माहिती शेतकºयांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.प्रत्येकाच्या शेतात विहीर, बोअरवेल पाण्याची सर्व साधने असताना यावर्षी पावसाने दांडी मारल्याने धरण भरलेले नाही. सद्य:स्थितीला धरणात शून्य टक्के पाणीसाठा आहे. जमिनीची पाणी पातळी खोल गेल्याने शेतातील विहिरी व बोरवेल कोरड्या पडल्या आहे. आॅक्टोबर महिन्यात ही स्थिती आहे तर पुढे काय होणार ही चिंता शेतकºयांना सतावत आहे.'माझी पंचवीस हजार केळीची बाग पाण्याअभावी पूर्णपणे कोमजली. यात मला चाळीस लाखांचा फटका बसणार आहे. याची शासनाने गंभीर दखल घ्यावी. माझ्यासारखे अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी.- डी.के.पाटील, प्रगतीशील शेतकरी, तोंडापूर