शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

जळगाव जिल्ह्याच्या विकासाला विद्यापीठाचा हातभार लागणार!

By अमित महाबळ | Published: October 26, 2023 7:18 PM

कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठात या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.

जळगाव : जळगाव जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा हातभार आता लागणार असून, या आराखड्यात कृषी व संलग्न सेवेची धोरणात्मक योजना तयार करण्यासाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय व विद्यापीठ यांच्यात गुरुवारी (दि. २६) सामंजस्य करार झाला.

कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठात या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्यात. जळगाव जिल्ह्याचा जिल्हा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी धोरणात्मक नियोजन व अंमलबजावणी आराखडा तयार केला जाणार असून, त्यामध्ये कृषी व संलग्न सेवा, उद्योग, जलसंधारण, पायाभूत सुविधा, आरोग्य, कौशल्य विकास, पर्यटन व इतर विविध क्षेत्रांचा समावेश असणार आहे. हा आराखडा तयार करतांना आर्थिक विकासाच्या दृष्टीकोनातून जिल्ह्याच्या विकासाचे व्हिजन सर्वसमावेशक व श्वाश्वत असणारा राहील. यामध्ये जिल्ह्यातील विविध घटकांची मते जाणून घेतली जाणार आहेत.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्याच्या आर्थिक विकास कामात विद्यापीठाने योगदान द्यावे व जिल्हा प्रशासनासाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत विद्यापीठ कायम जिल्हा प्रशासना सोबत राहील अशी ग्वाही दिली. याप्रसंगी कुलसचिव डॉ. विनोद पाटील, नवोपक्रम, नवसंशोधन व सहचर्य मंडळाचे संचालक डॉ. राजेश जवळेकर, जिल्हा विकास अधिकारी विजय शिंदे, सहायक अधिकारी सुधाकर बाविस्कर, सल्लागार शशी मराठे तसेच व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. सतीश कोल्हे, प्रा. पवित्रा पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. योगेश पाटील, वित्त व लेखाधिकारी सीए रवींद्र पाटील, प्रा. प्रवीण पुराणिक, प्रा. समीर नारखेडे, डॉ. उज्ज्वल पाटील हे उपस्थित होते.

विद्यापीठाकडे कृषी संलग्न क्षेत्राचे कामकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडे कृषी संलग्न क्षेत्र विकासासाठी धोरणात्मक योजना सादर करण्याचे काम सोपविण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा सामंजस्य करार करण्यात आला आहे.

विद्यापीठ या पद्धतीने करणार काम- जिल्ह्यातील कृषीचे प्राथमिक क्षेत्र आणि उपक्षेत्राचे सामर्थ्य / कमकुवतपणा याचे विश्लेषण करणे.- जिल्ह्यातील इकोसिस्टिम समर्थानावर आधारीत वाढ आणि आकांक्षा या अंतर्गत उपक्षेत्रांचे वर्गीकरण करणे- कालबध्द शाश्वत कृषी आराखडा यामध्ये लघु, मध्यम आणि दीर्घकालिन कृती योजना- जिल्ह्यातील निर्यात क्षमता वाढविण्यासाठी जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या कृषी संसाधनांच्या अन्न प्रक्रिया आणि मूल्यवर्धन करण्यासाठी असलेला वाव याबाबतीतील उद्दीष्ट्ये निश्चित करणे.

टॅग्स :Jalgaonजळगाव